सातारा : लोकसभा निवडणुकीत भाजप कितीही भ्रम निर्माण करत असेल, तरीसुद्धा महाविकास आघाडी राज्यातील ३५ ते ४० जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचा ४०० पारचा नारा केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असून प्रत्यक्षात देशात भाजप दीडशे जागांच्या वर जाऊ शकणार नाही, असं ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार बाबुराव माने यांनी येथे व्यक्त केला.
सातारा येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बाबुराव माने यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. सध्या देशातील वातावरण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असून देशातील तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांमध्ये त्यांच्याविषयी कमालीची नाराजी आहे. भाजपचा ४०० पारचा नारा केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या सभांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून महायुतीचे कार्यकर्ते खचू लागले आहेत. ते खचून जाऊ नयेत म्हणून ४०० पारचा नारा दिला जात आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्रातील भाजप सरकार काॅर्पोरेट राजकारण करत असून त्यांचे सर्वसामान्यांच्या व्यथावेदनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. उद्योगपतींच्या दुःखाकडे राज्यकर्ते अधिक लक्ष देत असून त्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करत आहेत. मात्र सामान्य शेतकरी, गरीब व्यावसायिक यांना कर्ज वसुलीसाठी वारंवार नोटिसा दिल्या जात आहेत. त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. फार मोठे काही घडणार अशा प्रकारचा भ्रम मागील दहा वर्षात निर्माण केला गेला होता. पण चकाकते ते सोने असतेच असे नाही हे आता लोकांना पक्के कळले आहे. सर्वसामान्य माणूस हे सर्व पाहत असून तो मतदानाची वाट बघत आहे. या निवडणुकीत तो याचे उट्टे काढल्याशिवाय राहणार नाही. आता मोठ्या सभांना भुलून लोकांचे मतदान होणार नाही असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
आजपर्यंत पंतप्रधान मोदी जे बोलले आहेत, त्याप्रमाणे काही घडलेले नाही. मग ते काही भावनिक मुद्दा पुढे करतात. हिंदू - मुसलमान करत बसतात. सर्वसामान्य हिंदूंना धर्माची नशा चढवायची आणि त्या नशेतून हिंदू मते बाजूला काढण्याचा प्रयत्न करायचा. त्यातून देशात मोठ्या प्रमाणात फूट पडली, समाजा - समाजात भांडणे लागली, माणसे मेली तरी यांना कशाची पर्वा नाही. मतांसाठी समाजात भांडणे लावण्याचे, दंगे पेटवण्याचे काम होताना दिसत आहे अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.
देशातील सद्य परिस्थितीविषयी नाक्यावर, पानाच्या ठेवल्यावर, चौकात, पारावर सामान्य माणसांमध्ये जी चर्चा होते त्यावेळी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता त्यांच्या सोबत असतो. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने आहे हे आमच्या लक्षात येते. जनता या निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे असे ते म्हणाले.
कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा देश विदेशात गौरव झाला. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्यांच्या कामगिरीचा गौरव केला. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या हृदयात उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याचप्रमाणे शरद पवार यांच्याविषयी आदराची भावना वाढली आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांच्यामध्ये प्रचंड सहानुभूती आहे असे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. पण एवढे स्पष्ट का बोललात म्हणून परवा छगन भुजबळ यांना महायुतीच्या लोकांनी दम दिला. यावरून राजकीय हवा कुठल्या बाजूने वाहते आहे हे स्पष्ट झाले आहे असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे व अजित पवार यांची एकही जागा निवडून येणार नाही. विधानसभा निवडणुकीवेळी तर भाजप या दोघांची अवस्था मांजर ज्याप्रमाणे उंदराला खेळवते तशी केल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. तशीच अवस्था शिंदे यांची आहे. जे लोक विश्वासाने त्यांच्यासोबत गेले त्यांच्या जागा हे टिकवू शकले नाहीत, तर विधानसभेला काय अवस्था होईल ते बघा असा खणखणीत टोला बाबुराव माने यांनी लगावला.
महायुतीने निवडणुकीपूर्वीच हार पत्करली
मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका असे नवनीत राणा यांनी सांगितले. तिकडे चंद्रकांत पाटील यांनीही माढ्याची लढाई आमच्यासाठी कठीण बनली आहे अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. छगन भुजबळ हेही महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट असल्याचे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड अपयश येणार आहे हेच या नेत्यांनी कबूल केले असून महायुतीने निवडणुकीच्या पूर्वीच हार पत्करलेली आहे अशी स्पष्ट प्रतिक्रिया बाबुराव माने यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |