सातारा : जिल्ह्यात दुष्काळ असल्याने यावर्षी उन्हाळी पिकाची हवाच गेली आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टरवरच पेरणी झाली. 32.30 टक्के हे प्रमाण आहे. तर आता खरीप हंगामावरच शेतकर्यांची भिस्त असून सर्वांचेच मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले आहेत.
जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वात मोठा हंगाम असतो. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते. तर रब्बीत दोन लाख हेक्टरवर पेरणी होते. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप हंगाम पेरणीची गडबड सुरू राहते. या मान्सूनवर शेतकर्यांचे वर्षभराचे पिकांचे गणित अवलंबून असते. पर्जन्यमान चांगले झाले तर खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतो. तसेच उन्हाळी हंगामातही शेतकरी पिके घेतो. पण, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकर्यांना फटका बसला. उत्पादन कमी झाले. त्यातच दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामावर परिणाम झाला.
कृषी विभागाकडून सातारा जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 4 हजार 860 हेक्टर निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये उन्हाळी भुईमूग, मका, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके शेतकरी घेतील असा अंदाज होता. मात्र, भुईमूग, मका, सोयाबीन पिके घेण्यात आली. सूर्यफुलाची कोठेही पेरणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या धसक्याने शेतकर्यांनी उन्हाळी पिकांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.
भुईमूग 1124, तर मका 413 हेक्टरवर...
जिल्ह्यात उन्हाळ्यात 2 हजार 699 हेक्टरवर भुईमूग घेण्यात येईल, असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात 1 हजार 124 हेक्टरवर पेर झाली. 41.67 टक्के पेरणी प्रमाण आहे. तर मकाचे सर्वसाधारण क्षेत्र 2 हजार 74 हेक्टर होते. तर पेरणी 413 हेक्टरवर झाली. सुमारे 20 टक्के क्षेत्रावरच मका पिकाची पेरणी झालेली आहे. सातारा तालुक्यात 372 हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र होते. पण, पेरणी 141 हेक्टरवरच झालेली आहे. तसेच जावळीत 32 हेक्टर, पाटण 206 हेक्टर, कर्हाड तालुक्यात 93, कोरेगाव 64, खटाव 453, माण 48 हेक्टर, खंडाळा 93, फलटण 103 आणि वाई तालुक्यात 34 हेक्टरवर उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहेत.
उन्हाळी सोयाबीन 1600 वरुन 14 हेक्टरवर...
मागील तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले. तसेच दोन वर्षांपूर्वी उन्हाळी सोयाबीन 1 हजार 600 हेक्टरवर घेण्यात आले होते. पण, गेल्या वर्षभरापासून सोयाबीनला दर कमी मिळत आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने यंदा उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोयाबीनचे अंदाजे क्षेत्र 31 हेक्टर निश्चीत करण्यात आलेले. प्रत्यक्षात 14 हेक्टरवर पेरणी झाल्याचे समोर आलेले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |