11:46am | Jul 26, 2023 |
अमर जवानचे नाव येताच आपल्या मनात जे चित्र उमटते, ते साहस, तळमळ, शिस्त आणि देशप्रेमाने भरलेल्या देशाच्या तारणहाराचे. देशातील जनतेच्या हृदयात सर्वात जास्त आदर देखील देशाच्या शूर जवानांसाठी आहे. देशाचे सैनिक कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी सदैव तत्पर असतात. कडक उष्मा, मुसळधार पाऊस, गोठवणारी थंडीत पण घर-कुटुंबापासून दूर, सैनिक त्यांच्या ध्येयावर टिकून राहतात. आपला सैनिक जर शत्रूच्या ताब्यात असेल, तर जवानाचे अमानुष छळ केले जाते, उपाशी-तहानलेले ठेवले जाते आणि अशा भयंकर यातना दिल्या जातात की आत्मा हादरतो, तरीही देशाचा सैनिक आपल्या ध्येयावर ठाम राहतो, म्हणूनच शूर सैनिकांबद्दल आपली मान नेहमीच अभिमानाने उंच होते. आजच्याच दिवशी भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांना हरवून कारगिलच्या शिखरावर तिरंगा फडकवला होता. भारताने १९९९ मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावत ऐतिहासिक विजय मिळवला. कारगिल युद्धातील त्या वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी "कारगिल विजय दिवस" साजरा केला जातो. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. कारगिल युद्ध ३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९ पर्यंत चालले, ज्यामध्ये देशाचे ५२७ शूर जवान शहीद झाले आणि १३६३ जखमी झाले.
एकीकडे देशाचा सैनिक आपल्या देशसेवेने जनतेच्या हृदयात कायमचा अमर होतो, तर दुसरीकडे देशात भ्रष्टाचार, सत्तेसाठी मारामारी, फसवणूक, स्वार्थ, लोभ, गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप, गुंडगिरी, क्लेश, ताणतणाव दिसून येतो. मणिपूरच्या मानवतेला काळिमा फासणारे घटनेने संपूर्ण देशाची मान शरमेने झुकवली आहे, वर्तमान काळात महिलांवर होणारे अमानुष अत्याचार समाजाचे घृणास्पद चित्र दर्शवितात. पिळवणूक, अत्याचाराच्या घटना घडत असताना हजारो लोक मूर्ती बनून पाहत असतात, जणू तमाशा सुरू आहे आणि मूठभर समाजकंटक उघडपणे सर्वांसमोर माणुसकीला लाजवतात. लोक फोटो काढतात, विडिओ बनवितात पण मदत नाही करीत. आसाम रेजिमेंटचे माजी सुभेदार म्हणाले की, ते कारगिल युद्धात लढले, भारतीय शांतता दलाचा एक भाग म्हणून श्रीलंकेत राहिले, त्यांनी देशाचे रक्षण केले, पण आज सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर मी माझ्या पत्नीचे, घराचे, गावाचे रक्षण करू शकलो नाही, मला खूप दुःख झाले आहे.
देशाचा सैनिक आपल्या कर्तव्यासाठी, देशासाठी, लोकांसाठी मृत्यू समोर पाहूनही आनंदाने आपल्या प्राणाची आहुती देतो, जेणेकरून देशात आणि मातृभूमीत शांतता नांदेल, देशाचे रक्षण होईल, देश सुरक्षित राहील. पण देशांतर्गत, समाज, घर-कुटुंब, नातेसंबंध, ओळखीमध्ये आज आपण पाहतो की प्रत्येकजण स्वतःमध्ये व्यस्त आहे, स्वतःसाठी जगतात. ते कधीही शब्द आणि कृतीत एकसंध नसतात, सल्ला देण्यात नेहमीच पुढे असतात, परंतु जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा स्वतःचे लोक देखील पळून जातात. आपण सुखसोयी, ऐषोआरामाने समृद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा आनंद घेत जीवन जगतो, कुटुंबासोबत राहतो, सण - विशेष प्रसंग एकत्र साजरे करतो. प्रत्येक सुख-दु:खात माणसे आपल्यासोबत असतात. जेवण, कपडे, आपल्या आवडीनिवडीच्या विनंत्या पूर्ण होतात, आपण आपला दिनक्रम आपल्या मनाप्रमाणे जगतो. मनासारखं वागतो, मनोरंजनाच्या साधनांचा आनंद घेतो, घुमत-फिरत असतो, अगदी आपल्या आयुष्यात नेहमी आवश्यक असलेल्या शिस्त, व्यायाम, योग्य आहार आणि संस्कारांकडे लक्ष देणे देखील आपण टाळतो, लोक आपल्या स्वार्थात इतके आंधळे झाले आहेत की एक रुपयाच्या फायद्यासाठी ते इतरांचा लाखो रुपयांचे नुकसान व जीवितहानी करायला देखील तयार आहेत. भेसळीचे विष स्लो पॉयझनच्या स्वरूपात लोकांना वाटले जात आहे. समाजात माणुसकी झपाट्याने लोप पावत आहे. लोक फक्त स्वतःचा विचार करतात. मग अशा समाजात देशासाठी बलिदान देण्याचा प्रश्नच दूर, म्हणजे निष्पापांचे बळी घेतील पण देशसेवेसाठी स्वतःचा जीव नाही देतील. अत्यंत कमी संसाधने असलेल्या दुर्गम भागात तक्रार न करता आपले काम चोखपणे पार पाडणे हे आपण देशाच्या सैनिकांकडून शिकले पाहिजे.
समाजात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक मारायला तयार असतात. भेदभाव करतात, ताबडतोब संतापतात. समंजसपणा, नैतिकता, एकता, बंधुता, सर्व धर्मांची समानता आणि संपूर्ण देश एक आहे, ही भावना आणि वागणूक देशातील शूर सैनिकांमध्ये दिसून येते. देशात कोणतीही परिस्थिती असली तरी शूर सैनिक आपल्या कर्तव्यावर, निष्ठेवर, नियमांवर, शिस्तीवर आणि आदेशाचे पालन करत ठाम राहतात. प्रत्येकजण उपजीविकेसाठी नोकरी, व्यवसाय करतो, कामाचा मोबदला घेतो, पण देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक इतर कुठे पाहायला मिळतात? शंभरपैकी एक गोष्ट म्हणजे शूर सैनिकांमुळे आपण आणि आपले कुटुंब, समाज, देश शांततेचा श्वास घेतो, ते आहेत म्हणून आपण आहोत. अनेक शूर सैनिक देशासाठी शहीद झाले, तरीही त्यांच्या पालकांना त्यांच्या इतर मुलांना सैन्यात पाठवायचे आहे, जेणेकरून तेही देशाचे रक्षण करू शकतील, अशा शूर मुलांचे आई-वडील एखाद्या शूर सैनिकापेक्षा कमी नसतात, हे धैर्य, तळमळ आणि देशासाठी समर्पण ही मोठी गोष्ट आहे. देश आधी येतो, मग घर-कुटुंब, नाती आणि समाज. हीच विचारसरणी प्रत्येक देशवासीयांच्या मनात असेल तर देशात कोणतीही समस्या नसणार.
आजच्या तरुण पिढीला काही ध्येय नाही का? ते कोणत्या दिशेने चालले आहेत? आधुनिकतेचा खोटा देखावा आपली मौलिकता, संस्कृती, माणुसकी, सभ्यता, प्रतिष्ठा, पुरुषत्व, मान सर्वांना चिरडत आहे. अश्लीलता, असभ्यता, गिधाड दृष्टी, संकुचित विचारसरणी, खोटेपणा आणि भेदभाव लोकांमध्ये रुजला जात आहे. समाज आणि देशाप्रती असलेले आपले कर्तव्य आपण का विसरत चाललो आहोत. आपण छोट्या-छोट्या गोष्टींवर का रागावतो, दिशाभूल होतो, भेदभाव करतो, समाजातील सतत वाढत जाणाऱ्या समस्यांना आपणच बहुतांशी जबाबदार आहोत आणि त्याची भरपाई देखील सर्वसामान्यांनाच करावी लागते. अंमली पदार्थांचे व्यसन, सोशल मीडिया आणि इंटरनेट गेमिंगने नव्या पिढीला वेड लावले आहे. नेते आणि अभिनेते हे तरुण पिढीचे आदर्श नसून देशासाठी प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक, समाजाला योग्य दिशा देणारे समाजसुधारक, देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारे शास्त्रज्ञ असावेत. कीटकांसारखे सतत आपसात लढत असणाऱ्या आपल्या सारख्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी देशाचा शूर सैनिक सीमेवर शहीद होतो का? समाजात आणि देशात आपण सर्व एक आहोत, भेदभावमुक्त वागणूक देऊन सर्व माणूस म्हणून जगले पाहिजे. परोपकार, बंधुता आणि सचोटीसाठी जगभर ओळखले जाणारे ते महान देशभक्त केवळ इतिहासाच्या पानातच उरले आहेत का? केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशभक्ती दाखवून आपण देशभक्त होत नाही. त्यापेक्षा देशाला कोणत्या परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले, किती लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, किती अत्याचार सहन केले आणि किती संघर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळाले, हे प्रत्येक देशवासीयाने प्रत्येक क्षणी लक्षात ठेवून देशातील तिरंग्याची व संविधानाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. ज्या प्रकारे आपल्या देशाच्या शूर सैनिकांचा आपल्याला अभिमान आहे, त्याच प्रमाणे त्या शूर सैनिकांना देखील आपल्या देशवासीयांचे अभिमान वाटू द्या.
डॉ. प्रितम भि. गेडाम
मोबाईल आणि व्हॉट्सअॅप क्र. ०८२३७४ १७०४१
prit00786@gmail.com
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |