10:42pm | May 07, 2024 |
सातारा : पश्चिम महाराष्ट्रात चर्चित राहिलेल्या सातारा, माढा, बारामती लोकसभा मतदारसंघापैकी लक्षवेधी ठरलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी 63.07 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या सुविधा देऊनही मतदार राजाचा कौल गतपंचवार्षिकच्या तुलनेने काठावरचा राहिला. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत मतदार राजा मतदान केंद्राकडे फिरकलाच नाही. सकाळी पहिल्या दोन तासात आणि सायंकाळी शेवटच्या दोन तासात मतदार राजांनी केलेल्या मतदानामुळे रिंगणातील 16 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून जिल्ह्यातील 2300 मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी सकाळी पहिल्या सत्रात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला, तर काही ठिकाणी उन्हामुळे निरुत्साह दिसून आला. सायंकाळी अखेरच्या शेवटच्या तासाभरात 54.1, तर सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी ही 63.07 टक्क्यांवर वर पोहोचली होती.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सातारा शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचार्यांमुळे दुपारपर्यंत कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा शहरातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय मदत कक्ष, दिव्यांग कक्षाची व्यवस्था, वेब कास्टिंग तसेच भरारी पथकांच्या भेटी, मतदारांसाठी रेड कार्पेट, थंड पाण्याची आणि ओ आर एस पावडर ची व्यवस्था, मोबाईल हेल्थ वर्कर ची व्यवस्था इत्यादी उपायोजना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या होत्या.
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, बांबू प्रकल्प, वाचन अभियान, मिलिटरी अपशिंगे गाव या संकल्पना मतदान केंद्रावर अवतरल्या होत्या. त्यासाठी 17 मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती. गोडोली येथील शाळा क्रमांक 23 येथील राजमाता जिजाऊ मंदिर त्याला बांबू प्रकल्पाची सजावट करण्यात आली होती. बांबूचे आकाश कंदील मतदान केंद्रावर दिसून आले. मतदानाला येणार्या प्रत्येक मतदाराला बांबूची रोपे भेट देण्यात आली, तर राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल मधील मतदान केंद्रालाही वाचन समृद्धी मतदान केंद्राचे नाव देण्यात आले. लोकशाहीची चाहूल, वाचता वाचता मिळते ज्ञान करू शंभर टक्के मतदान, असे संदेश याप्रसंगी देण्यात आले होते.
उन्हाची तीव्रता कमी होताच शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदाराची गर्दी हळूहळू वाढू लागली. सकाळी पहिल्या दोन तासामध्ये मध्ये सरासरी 7.8 टक्के मतदान झाले होते, तर अकरा वाजता 18.85, दुपारी तीन वाजता 43.44, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.1 इतके मतदान नोंदवले गेले. कोरेगाव मतदारसंघामध्ये 5 वाजेपर्यंत 52.71 टक्के, वाई मतदारसंघात 51.9 टक्के, कराड उत्तर 54.89 टक्के, कराड दक्षिणमध्ये 56.99 टक्के, पाटण मतदारसंघामध्ये 50.3 टक्के, सातारा मतदारसंघामध्ये 53.55 टक्के मतदान झाले.
सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गोडोली येथील मतदान केंद्रावर आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. उमेदवारीच्या रिंगणात असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी सातार्यात अनंत इंग्लिश स्कूल येथे, तर ल्हासुर्णे, तालुका कोरेगाव येथे आमदार शशिकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराडमध्ये खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी त्यांच्या-त्यांच्या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी लोकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी 100 टक्के मतदान करावे, अशा सामायिक प्रतिक्रिया दिल्या होत्या.
सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये काही ठिकाणी वोटिंग स्लीप न मिळाल्यामुळे मतदारांना रांगेमध्ये ताटकळावे लागले. मात्र बीएलओ आणि केंद्रप्रमुख यांच्या सहकार्याने मतदार यादी झटपट हाताळून त्यांनी मतदारांना मतदानाची संधी उपलब्ध करून दिली. कराड उत्तर, कराड दक्षिण पाटण या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये तीन वाजेपर्यंत सरासरी 40.3 टक्के इतके मतदान झाले होते. सातारा विधानसभा मतदार संघामध्ये 42.3 टक्के मतदान झाले. मतदानाचा आकडा उन्हाच्या तडाख्यामुळे गतीने वाढत नव्हता. मात्र सायंकाळी साडेचार च्या नंतर मतदानाची टक्केवारी सरासरी साडेआठ टक्क्याने वाढली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ज्या-ज्या मतदान केंद्रांवर मतदार उभे होते, त्यांना चिठ्ठ्या देऊन त्यांचे मतदान करून घेण्यात आले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी प्रत्येक पन्नास कुटुंबा मागे एक नोडल अधिकारी नेमून नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्याची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात आली. सातारा शहरांमध्ये 134 मतदान केंद्रे होती. या मतदान केंद्रांवर शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.
वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदार राजाने मतदान प्रक्रियेला प्रतिसाद दिला मात्र तो फारसा उत्साहवर्धक नसल्याचे दिसून आले. काही मतदान केंद्रांवर तर अगदी शुकशुकाट होता. महाबळेश्वर, जावली, पाटण या तीन तालुक्यातील दुर्गम भागामध्ये बहुतांश ठिकाणी अडचण असूनही मतदार राजा मतदान केंद्रावर पोहोचल्याची माहिती आहे. तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याची चांगली सोय करण्यात आली होती. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाला पैकीच्या पैकी गुण देणे गरजेचे आहे. चांगल्या तयारीमुळे दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित राहिले नाहीत. 1108 ज्येष्ठ नागरिकांना घरात बसून मतदान करणे शक्य झाले, तर सातारा जिल्ह्यातील 11 हजार सैनिकांनी पोस्टल मतदान केल्यामुळे मतदानाचा आकडा कुठे घसरणार नाही याची काळजी घेण्यात आली.
सातारा जिल्ह्यात सुमारे अडीच हजार पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. होमगार्ड तसेच दंगा नियंत्रण पथक हे सुद्धा तैनात करण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्राला पंधरा ते वीस पोलिसांचा बंदोबस्त राहील अशी व्यवस्था होती. या सर्व बंदोबस्ताची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाहणी केली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील 18 गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या सर्व एन्ट्री पॉईंट वर पोलीस बंदोबस्त तैनात होता. गेले दोन दिवस ड्राय डे असल्यामुळे मद्यविक्री बंद ठेवण्यात आली होती.
मतदार राजाचा कौल हा 63.07 टक्के राहिला आहे. मंगळवारी निवडणुकीच्या रिंगणातील 16 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले. मतदान झाल्यानंतर सुमारे 11 हजार कर्मचार्यांकडून मतदान साहित्य जमा करून घेणे आणि उपलब्ध मतदानाची आकडेवारी याचा ताळेबंद मांडणे या प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या औद्योगिक वखार महामंडळामध्ये रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन जमा करून घेण्याचे काम सुरू होते. या गोडाऊनला सुमारे साडेपाचशे पोलिसांनी बंदोबस्त दिलेला आहे. येत्या चार जून पर्यंत हा बंदोबस्त तसाच येथे तैनात राहणार असून त्याची कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |