11:10am | Sep 07, 2021 |
सातारा : असे म्हणतात की माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. म्हणजेच, जर तुम्हाला कोणाचे मन जिंकायचे असेल किंवा खुश करायचे असेल तर त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घाला. पण मग हे देखील कारण आहे की बर्याचदा एखादा पदार्थ खूप आवडला की आपण त्याच्या प्रमाणावर अजिबात लक्ष देत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खात जातो, ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. तसंच जठराशी संबंधित ग्रंथी जेव्हा जास्त आम्ल (acid) निर्माण करतात तेव्हा अॅसिडिटीची समस्या उद्भवते. यामुळे गॅस, तोंडाची दुर्गंधी, पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होऊ लागतात. तसं तर गॅस दोन प्रकारे शरीरात तयार होतो. कॅनेडियन सोसायटी ऑफ इंटेस्टाइनल रिसर्चच्या मते, जेवताना शरीरात हवा प्रवेश करते तेव्हा गॅस तयार होतो. या दरम्यान शरीरात नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्रवेश करतात.
तर दुसरीकडे, जेव्हा आपण अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा शरीरात हायड्रोजन, मिथेन किंवा कार्बनडायऑक्साईड यासारखे गॅस शरीरात तयार होऊ लागतात. या गॅसवर वेळेवर काही उपाय केले नाही तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. या गॅसशी संबंधित समस्यांपासून लोक सहज आराम मिळवू शकतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
ताकाचे सेवन करा
ताकाची गणना सात्त्विक अन्नाच्या श्रेणीत केली जाते. त्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आढळते जे आपल्याला गॅस्ट्रिक अॅसिडिटीपासून आराम देऊ शकते. जर पुढच्या वेळी तुम्हाला गॅसची किंवा अपचनाची समस्या जाणवत असेल तर लगेचच काळी मिरी आणि कोथिंबीरीचा रस मिसळून एक ग्लास ताक प्या. यामुळे तुम्हाला गॅसपासून लवकरच आराम मिळेल. ताक प्यायल्याने पचनशक्ती वाढते व पोट लवकर साफ होते. पोट साफ झाल्याने अनेक आजार दूर पळून जातात शिवाय त्वचा व केसांसाठीही याचे अगणित लाभ मिळतात.
केळी खा
अॅसिडिटी किंवा गॅस दूर करण्यासाठी अनेक दशकांपासून केळीचा वापर केला जात आहे. तुम्हाला माहित नसेल पण केळी मध्ये नैसर्गिक अँटासिड असतात जे तुमचा अॅसिड रिफ्लक्स पासून बचाव करण्यास मदत करतात. गॅसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक केळ खाऊ शकता. योग्य रितीने केळ खाल्ल्यास वजन देखील कमी होऊ शकते.
जेवणात करा लवंगाचा उपयोग
आपल्या प्रत्येक भारतीय पदार्थामध्ये फोडणी देण्यासाठी सर्रार वापरल्या जाणा-या लवंगामुळे जेवणाची चव वाढते आणि याच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे तर सर्वांना ठाऊक आहेच. पण त्यामध्ये कार्मिनेटीव्ह प्रभाव असतो. वास्तविक, हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट मध्ये म्हणजेच जठरात गॅस निर्माण होण्यापासून बचाव करण्याचे कार्य करते. जर तुम्ही राजमा किंवा काळे चणे बनवत असाल तर ते बनवताना लवंगाचा वापर नक्की करा. लवंग कच्ची चावून खाल्ल्याने तोंडाचे अनेक आजार बरे होतात तसंच दातदुखीपासून आराम मिळतो.
भाजलेले जिरे किंवा जि-यांची पावडर पाण्यात घालून प्या
जिरे एक उत्कृष्ट अॅसिड न्यूट्रलायझर म्हणून ओळखले जाते. हे केवळ पचनाशी निगडीत समस्याच दूर करत नाही तर पोटदुखी पासून देखील चुटकीसरशी आराम मिळवून देते. जेवणा नंतर भाजलेले जिरे थोडे ठेचून घ्या आणि ही पावडर एक ग्लास पाण्यात टाकून प्या किंवा गरम पाण्यात एक चमचा जिरे घालून ते पाणी प्या. जि-याने पोटाचे सर्व विकार दूर होतात आणि अगदी 5 मिनिटांत झटपट होणारा हा उपाय आहे.
गरम पाण्यासोबत करा तुळशीच्या पानांचे सेवन
तुळशीच्या पानांमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात जे आपल्याला अॅसिडिटी आणि अपचन या समस्यांपासून त्वरित आराम देऊ शकतात. तुम्हाला फक्त तीन ते चार तुळशीची पाने घ्यायची आहेत आणि ती चावून खायची आहेत. याशिवाय जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुळशीची पाने गरम पाण्यात टाकून त्या पाण्याचे सेवन करू शकता. तुळशी सारखी पवित्र वनस्पती दुसरी कोणतीही नाही त्यामुळे त्वचारोगांपासून इतर अनेक आजार बरे करण्यास ही सक्षम असते.
दालचिनीचा चहा प्या
दालचिनी हा मसाल्यांच्या डब्ब्यातील असा मसाला आहे जो चवी सोबतच शरीराच्या विविध भागांना वेगवेगळे फायदे मिळवून देतो. आम्ही तुम्हाला सांगू की हा एक सामान्य मसाला आहे जो नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करतो आणि पचनक्रिया सुधारून पोट शांत ठेवण्यास मदत करतो. याव्यतिरिक्त दालचिनी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट मधील संक्रमण बरे करू शकते. यासाठी दालचिनी घातलेला चहा योग्य प्रमाणात घेतल्याने बरेच लाभ होतात.
अॅप्पल सायडर व्हिनेगर
अनेक वेळा शरीरात अॅसिड रिफ्लक्स होण्याचे कारण पोटात अॅसिडची कमतरता असणे हेच असते. अशा वेळी आपण अॅप्पल सायडर व्हिनेगर वापरू शकता. तुम्हाला फक्त एक कप पाण्यात दोन चमचे अनफिल्टर केलेले अॅप्पल सायडर व्हिनेगर घालायचे आहे. या पाण्याचे दिवसातून दोनदा सेवन केल्याने तुम्हाला पोटाशी संबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळेल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |