10:17pm | Apr 28, 2024 |
सातारा : आधी धरण, नंतर पुनर्वसन ही लोकप्रतिनिधींची भूमिका होती. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून धरणांची कामे करत असताना धरणाचे काम आणि पुनर्वसन एकाच वेळी सुरू राहिले पाहिजे, अशी मी भूमिका घेतली. त्यानंतर सध्याचा पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
हेळवाक रासासाटी येथे महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, गोविंद कुराडे, बबन पाटील, निजामभाई, भैयासाहेब पाटणकर, शंतनु भुमकर, अशोकराव पाटील, प्रदीप पाटील, नंदकुमार सुर्वे, भैयाजी शेळके, हेमंत कापले यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे कोयना धरण नसते तर महाराष्ट्र अंधारात असता. या परिसरात राहणाऱ्या लोकांचे मोठे उपकार महाराष्ट्रातील जनतेवर आहेत. कोयना धरण बांधले जात असताना जनतेने कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत. घरादाराची परवा न करता धरणा करता जमिनी दिल्या. त्यावेळच्या राज्यकर्त्यांवर लोकांनी विश्वास ठेवला. मात्र इतर धरणांची कामे सुरू असताना धरण आणि पुनर्वसन या बाबी एकाच वेळी केल्या जाव्यात असा मी आग्रह धरला. त्यातूनच पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला.
शंभूराज देसाई म्हणाले, राज्य शासनाने कोयना जलपर्यटनासाठी साडेतीनशे कोटींचा आराखडा तयार केला. मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले. कोयना भागातील पर्यटन वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 68 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामध्ये पर्यटकांना जवळून कोयना परिसरातील निसर्ग पाहता येईल. आचारसंहिता संपताच या भागातील पर्यटन आराखड्याच्या अनुषंगाने पहाणी दौरा केला जाणार आहे. या भागातील जनतेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी महायुतीच्या सरकारने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |
ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली! |
विवाहितेचा जाचहाट प्रकरणी पतीसह सासऱ्यावर गुन्हा |
गॅरेज मधून गाडीच्या दीड लाखांच्या साहित्याची चोरी |
सातारा शहरातील दोन सराफी दुकानांमध्ये दागिन्यांची चोरी |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |