05:44pm | Apr 09, 2020 |
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉक डाऊन जाहीर केला असला तरी खरा प्रश्न आहे तो, लॉक डाऊन संपल्यानंतर पुढे काय वाढून ठेवले आहे याचाच. लॉक डाऊनमुळे देशातील औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. त्याला सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, खंडाळा, फलटण येथील औद्योगिक वसाहतही अपवादात्मक ठरल्या नाहीत. त्यामुळे आपला रोजगार, रोजंदारी, नोकरी अबाधित राहणार का या प्रश्नाने अनेकांच्या झोपाच उडून गेल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे वादळ घोंगावत असतानाच अनेक जणांना नैराश्याने ग्रासले असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. या पाठीमागील कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नोकर कपातीची भिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.
सातारा, कराड, खंडाळा, फलटण येथे औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. या वसाहतीमध्ये नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साधारण ७० ते ७५ हजारांपेक्षा अनेक जणांना रोजगार उपलब्ध झाला होता. खंडाळा, शिरवळ आणि फलटण येथे औद्योगिक वसाहत उभी राहिल्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची एक नामी संधी उपलब्ध झाली होती. या कंपन्यांमध्ये भूमिपुत्रासह परराज्यातून आलेल्या परप्रांतीय कामगारांचा मोठा समावेश पाहायला मिळतो. देशभरात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर १४ एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या वस्तुस्थितीला जवळपास सर्वच कामगारांनी स्वीकारले असताना लॉक डाऊन संपल्यानंतर पुढे काय हा नवीनच प्रश्न त्यांना आता भेडसावत आहे. परदेशातून, परराज्यातून कंपन्यांना मिळालेल्या अनेक ऑर्डर लांबल्यामुळे त्यातील काही ऑर्डर रद्द करण्यात आल्यामुळे अनेक कंपन्यांचे भविष्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास अनेक कंपन्या नोकर कपातीचे धोरण स्वीकारण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे लॉक डाऊननंतर आपली नोकरी, रोजगार, रोजंदारी कायम राहीलच याची कोणतीच खात्री नसल्यामुळे अनेकांना नैराश्याने ग्रासल्यामुळे त्यांच्या झोपा उडाल्या असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. अचानक नोकरी अथवा रोजगार संपुष्टात आल्यास कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? नोकऱ्या गेल्याच तर लॉक डाउनलोड तर जिल्ह्यात अथवा राज्यात कोठे नोकऱ्या मिळणार हा एकच विचार मनात येत असल्यामुळे अनेकांना मानसिक आजार भेडसावू लागला असल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारच्या संभाव्य भीतीमुळे अनेकांनी अन्नच सोडून दिले असल्याचे सांगितले जाते.
झोप येत नसल्याची तक्रार
याबाबत सातारा शहर परिसरातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, यापूर्वी सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या तक्रारी घेऊन नागरिक दवाखान्यात येत असत. सध्या मात्र या तक्रारी समवेत अनेकांची रात्री झोपच येत नसल्याची तक्रार असल्यामुळे संबंधितांना मानसिक ताणतणावातून जावे लागत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
गड्या आपला गाव बरा...
कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण पुणे, मुंबई येथे नोकरी, रोजगार यासाठी वास्तव्य करणारे स्थानिक भूमिपुत्र पुन्हा आपल्या गावाकडे परतले आहेत. यापैकी अनेकांनी लॉक डाऊनमुळे आपली नोकरी अथवा रोजगार धोक्यात आल्यास गावातच शेती करण्याची मानसिकता केली असल्याचे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |