पाणी हे जीवन आहे, म्हणून प्राचीन काळापासून पाणी पूजन करुन त्याचे संवर्धन करण्याची परंपरा या देशात प्राचीन काळापासून होती. सप्त सिंधू पुजन हे त्याचे प्रतिक आहे. यापुढे सप्त मातृका झाल्या काही ठिकाणी त्याला आसरा म्हणूनही ओळखले जाते, अशी महान परंपरा असलेल्या देशात पुढे पाण्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यय होवू लागला. प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड आणि अमाप जमिनीच्या पोटातून पाणी उपसा यामुळे अपरिमित अशी धुप होवून पाण्यानेच माणसांकडे पाठ केली. आता मात्र चल चळवळ जोम धरु लागली असून जल साक्षरतेची ओळख लोकांना होत आहे. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबवून लोकांच्या मनातील चळवळीला मोठे बळ दिले आहे. अशा या चळवळीचा सातारा जिल्ह्यातील लेखाजोखा वाचकांसाठी देत आहोत…
जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाचा महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्हा प्रशासन व लोकसहभागातून चांगले काम झाले आहे. या अभियानांतगत सन 2015-16, 2016-17, 2017-18 व 2018-19 या चार वर्षात अखंड काम सुरु आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये 215 गावांची निवड करण्यात आली असून 8 हजार 418 कामे घेण्यात आली यावर 16402.42इतकी रक्कम खर्च करण्यात आली. झालेल्या कामाची 100 टक्केवारी आहे. सन 2016-17 मध्ये 210 गावांची निवड करण्यात आली 5 हजार 665 कामे हाती घेण्यात आली असून 13891.75 लाख रक्कम खर्च करण्यात आली असून कामाची 76 टक्केावारी आहे. 2017-18 मध्ये जयलुक्त शिवार अभियानांर्तगत 210 गांवाची निवड करण्यात आली असून यामध्ये 2 हजार 875 कामे हाती घेण्यात आली असून त्यावर 629.11 लाख इतका खर्च करण्यात आला असून झालेल्या कामाची 76 इतकी टक्केवारी आहे.
सन 2015-16 मध्ये जलयुक्तच्या कामांमुळे फलनिष्पती पुढीलप्रमाणे : लागवडीखालील क्षेत्र 84947.65 इतके अभियानांपूर्वी इतके होते आता हे 90321.02 इतके झाले आहे. 150039 इतकी अभियानापूर्वीची जनावरे, शेळ्या, मेढ्यांची संख्या होती आता 175542 इतकी आहे. अभियानापूर्वी 10891 इतक्या विहिरींची संख्या होती अभियानांतर्गत 12221 विहिरींची संख्या झालेली आहे.
खरीप पिक पद्धती झालेला बदल व उत्पादकता वाढ क्वि. हेक्टरमध्ये : बाजरी 9.71 अभियानापूर्वी 11.58 अभियानानंतर, मूग 4.86 अभियानापूर्वी 6.25 अभियानानंतर, उडिद 3.9 अभियानापूर्वी 4.43 अभियानानंतर, सोयाबीन 14.79 अभियानापूर्वी 16.36 अभियानानंतर अशा प्रकारणे जयुक्त शिवार अभियानामुळे कृषी उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे.
गावांना लागणाऱ्या टँकरची स्थिती : सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या 210 गावांना सन 2016 मध्ये 82 गावांना 62 टँकर लागत होते या टँकरच्या संख्येत लक्षणीय घट होवून आता फक्त 3 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. सन 2016-17 मध्येही 210 गावांची जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आली होती. या गावांना सन 2017 मध्ये 27 गावांना 30 टँकरने पाणी पुरवठा केला जाता होता आता ही परिस्थिती बदलून 2 गावांनाच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांर्तगत झालेल्या गावांतील 106 विहिरींचे निरीक्षण केले असता भूजल पातळी 0.51 ते 1.38 मिटरने वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेली वैशिष्टपूर्ण कामे : किवळ ओढा जोड प्रकल्प कराड तालुक्यातील गाव असून कृषी विभाग, लोकसहभाग, ग्रामपंचायत किवळ, सह्याद्री साखर करखाना, जैन इरिगेशन यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पावर 7.02 लाख इतका खर्च करण्यात आला असून यामुळे 180 हेक्टर क्षेत्र सिंचना खाली असून 32 विहिरींना या प्रकल्पाचा लाभ झाला आहे.
चांदक-गुळूंब ओढा जोड प्रकल्प :
* चांदक येथील ओढा पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरुन वाहतो. या ओढ्यावर चार ठिकाणी बांध आहेत की जे पूर्ण क्षमतेने भरुन वाहतात
* या उलट गुळुंबमध्ये पडणाऱ्या कमी पावसामुळे पाणी टंचाई भासते.
* दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे गुळुंब परिसरातील 14 गावांमध्ये पाण्यासाठी टँकर द्यावा लागतो
* चांदक ते गुळुंब पाझर तलाव हे अंतर 1130 मीटर इतके आहे. या दरम्यान 500 मि. मि. व्यासाची पाईपलाईन टाकली आहे.
* गुळुंब येथील पाझर तलावाची क्षमता 497 टीसीएम इतकी आहे.
* पाझर तलावांखाली असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या 3 तसेच कृषी क्षेत्रासाठी 28 विहिरींना फायदा होणार आहे.
* या ओढा जोड प्रकल्पामुळे 1 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
नदी पुर्नजीवन प्रकल्प : येरळा नदी ता. खटाव, माणगंगा नदी ता. माण, वांगणा नदी ता. कोरेगाव, वसना नदी ता. कोरेगाव बाणगंगा नदी ता. फलटण या नद्यांवर पेशवे कालीन तसेच ब्रिटीश कालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच सर्व नद्यांवर नवीन बंधारे बांधण्यात आले आहेत व या नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यां गावांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर वेळू ता. कोरेगाव या गावास प्रथम, विसापूर ता. खटाव द्वितीय विभागून, किवळ ता. कराड द्वितीय विभागून राजापूर ता. खटाव तृतीय, इंजबाव ता. माण चौथा क्रमांक देवून गौरविण्यात आले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 व 2016-17 मध्ये हाती घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे, उपचारांमुळे 17040.24 टिसीएम पाणी साठा उपलब्ध झाला असून विहिंरींच्या पाणी पातळीत 0.50 ते 1.38 मिटरने वाढ झालेली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2018-19 मध्ये शासनाच्या निकषाच्या अधिक राहून 88 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत व कामेही प्रगतीपथावर आहेत.
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी,
सातारा
शेतकऱ्यांनी जास्ती जास्त कृषी क्षेत्र ठिबक खाली आणावे : जिल्हधिकाऱ्यांचे आवाहन
जलयुक्त शिवार ही योजना आता योजना राहिली नसून एक चळवळ बनली आहे. या चळवळीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी टिकून ठेवण्यासाठी माती परीक्षण करुनच योग्य ती पिके घ्यावीत. पाणी जपून वापरने ही काळाजची गरज बनली आहे. याची जाणीव आता सर्वसामान्यांना होत आहे. ती अधिक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
लोकांनी एकतेच्या जोरावर जलसंधारणाची जिल्ह्यात चांगली कामे केली. त्यामुळे गावांना शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या पिकांना जास्त पाणी लागते अशी पिके घेवू नयेत. जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |