भारत हा देश उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम असा सुमारे 3 कोटी 2 लाख 87 हजार 263 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे. सुमारे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये 22 अधिकृत राजभाषा बोलल्या जातात. तसेच हजारो बोलीभाषाही भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये बोलल्या जातात. असे म्हणतात की दर अडीच मैलामध्ये बोलीभाषेचे स्वरुप बदलले जाते. मराठीचा विचार केल्यास कोकणी, खानदेशी, वर्हाडी अशा भाषा बहुतकरुन बोलल्या जातात. वर्हाडातील भाषा समजण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात राहणार्या माणसाला काही वेळ लागतो. ‘पॉज’ घेतल्यानंतरच समोरच्याला काय म्हणायचे आहे, हे समजते. भाषेची अडचण सामान्य माणसालाच नाहीतर प्रशासनातील अधिकारी, राजकारणी यांनासुद्धा या अडचणीचा सामना करावा लागतो. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा समजली जाते. परंतू उत्तरेतील काही राज्ये सोडल्यास या हिंदीचा कोठेही मागमूस नाही. याचा नेमका फटका बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये बसला जातो. याचे उत्तम उदाहरण अमित शहाच्या कर्नाटक दौर्यावर असताना पहावयास मिळाले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधी यांनी देशाचा गाडा हाकताना कोणत्याही प्रादेशिक भाषेला कधीही अवास्तव महत्त्व दिले नाही. एखादी गोष्ट पचनी पडेल एवढेच त्याच्या आहारी जायचे असते, नाहीतर ते अजीर्ण होते. त्याचा त्रास भल्याभल्यांना झालेला आहे. स्लीप ऑफ टंग म्हणून अनेकांनी अशावेळा मारुन नेल्या. परंतू इतिहासाने मात्र या गोष्टींची नोंद घेतलेली आहे. पेशवाईमध्ये ‘ध’चा ‘मा’ केल्यानंतर काय होते, हे आपण इतिहासामध्ये वाचलेलेच आहे. त्यामुळे या ‘ध’ चा ‘मा’ मुळे इतिहासच बदलला. या आणि अशा अनेक नोंदी इतिहासामध्ये सापडतात. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असणारे हे राज्य गेल्या निवडणुकीत भाजपच्या हातून निसटले होते. ते राज्य परत मिळविण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा सुप्रिमो अमित शहा, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच कर्नाटकात सध्या तळ ठोकून आहे.
दक्षिणेतील ‘सुभा’ मिळविण्यासाठी कर्नाटकची गढी मिळविणे भाजपच्यादृष्टिने महत्त्वाचे आहे. कर्नाटकला लागून असलेल्या तमिळनाडू व केरळात भाजपला शिरकाव करायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळात संघाच्या कार्यकर्त्यांचे शिरकाण केले जात आहे. देशभरात बिफ बंदी असताना केरळात मात्र खुलेआम बिफची विक्री केली जात आहे. भाजप आणि संघाच्यादृष्टिने खरेतर केरळमध्ये रावणराज सुरु आहे. हे रावणराज संपविण्यासाठी कर्नाटक ‘सुभा’ मिळविणे भाजपच्यादृष्टिने प्रतिष्ठेचे बनले आहे. इंदिरा गांधी, व्ही. पी. सिंग, राजीव गांधी, देवेगौडा, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग (पी. व्ही. नरसिंहरावांचा अपवाद वगळता. कारण ते बहुभाषिक होते.) या अलिकडच्या ज्ञात असणार्या पंतप्रधानांपैकी कोणत्याही पंतप्रधानांनी त्या-त्या राज्यांशी संवाद साधताना प्रादेशिक भाषांमध्ये बोलण्याच्या संबंधातील आग्रह धरला नाही. जी भाषा अवगत आहे, त्याच भाषेमधून त्यांनी त्या - त्या राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यामुळे देशाचा विकास खुंटला नाही, किंवा जागतिक विकासदर मंदावला नाही.
परंतू 2014 सालापासून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्यात जातील, त्या राज्याच्या भाषेमधून जनतेशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे त्या राज्यातील जनतेला त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधणारे मोदी हे आपल्यापैकीच वाटतात. ही किमया केवळ मोदीच करु शकतात. परंतू ही मोदींची ‘री’ भाजपच्या मंत्र्यांकडून आणि भाजप सुप्रिमो अमित शहा यांनी सध्या ओढलेली दिसत आहे. हे भाषांतराचे काम त्या- त्या राज्यातील पहिल्या रांगेतील मनसबदारांकडे सोपविण्यात आलेले आहे. परंतू फज्जा कसा होतो, हे आपण अलिकडे दोन दिवसांत घडलेल्या घटनांवरुन समजू शकतो. अस्खलिखितपणे एखादी भाषा बोलण्यासाठी त्या प्रदेशात किमान काही दिवस रहावे लागते. भाषेचा हेल, व्याकरण, अलंकारिता या सर्व गोष्टी समजून घेणे आवश्यक असते. तेव्हाच ती भाषा बोलण्यात एखादा माणूस पारंगत होवू शकतो. भाषांतर करुन कितीही घोकंपट्टी केली तरी ऐनवेळी विचका होतोच.
कर्नाटक येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सुप्रिमो अमित शहांनी प्रचार रॅलींचा धडाका लावला आहे. धारवाड जिल्ह्यातील दावणगिरेमधील प्रचारसभेमध्ये बोलताना कर्नाटकाचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले, ‘कर्नाटकातील कॉंग्रेसने राज्यात कोणतेही विकासाचे काम केलेले नाही. त्यामुळे तुम्ही मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान करा.’ परंतू अमित शहा यांचा कन्नड अनुवादक आणि भाजपचे दावणगिरेचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांनी अमित शहा यांच्या भाषेचा अनुवाद करताना म्हणाले की, ‘मोदींजवळ दलित आणि मागासवर्गीयांसाठी कोणतेही व्हिजन नाही. ते देशाला बरबाद करतील.’ दुसर्या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधताना सिद्धरामय्या आणि येडियुरप्पा या दोन नावांमधील फरक न समजल्यामुळे त्यांनी भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असणार्या येडियुरप्पा यांच्यावरच शहांची जीभ घसरली. राज्यातील युडियुरप्पा सरकार अतिशय भ्रष्ट असल्याची टिपण्णीही त्यांनी केली.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील झालेल्या प्रचारसभेत अशाच प्रकारच्या गोंधळाचा सामना अमित शहांना करावा लागला. यावेळी मात्र अमित शहा हिंदीतून जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला की, तुम्ही येडियुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू इच्छिता? हे शहांनी गुजराती हेलमध्ये हिंदीतून विचारलेला प्रश्न उपस्थितांना न समजल्यामुळे सर्वांनी हातवारे करुन येडियुरप्पांना नकार दर्शविला. अशा गंमती-जंमती कॉंग्रेसच्या कार्यकाळात यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा मोदी-शहा थोडे उजवेच म्हणावे लागेल. परंतू केंद्र शासनातील उत्तर भारतीय पुढार्यांना दक्षिणेत गेल्यानंतर अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. शेवटी भाजप सुप्रिमो अमित शहांनी आपली जीभ घसरण्याचे खापर जोशींवर फोडून ते नामानिराळे झाले. शेवटी जाताजाता शहांनी ‘अरे जोशी, तुने ये क्या किया...!’ असे म्हणत गळ्यात असलेल्या कमळाच्या उपरण्याने कपाळावरील घाम टिपत दावणगिरे सोडणे पसंत केले.
-संग्राम निकाळजे
सातारा टूडे मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
www.bit.ly/SataraToday
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |