सातारा : व्हॉट्सऍपच्या उपलब्धतेमुळे सोशल मिडियावर नवक्रांती झालेली आहे. क्षणार्धात एखादा मॅसेज हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे एक पर्यायी साधन म्हणून व्हॉट्सऍपकडे पाहिले जात आहे. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संपूर्ण जग एका धाग्यात गुंफले गेले आहे. परंतू जेवढा फायदा, त्याच्या कैकपटीने तोटासुद्धा असतो याप्रमाणे अलिकडे घडलेल्या काही हृदयद्रावक घटना या व्हॉट्सऍपमुळेच जगभरात घडलेल्या आहेत. त्यामुळे लाखो व्हॉट्सऍप ग्रुप तयार करणार्या ऍडमिनलाही अतिरेकी ग्रुप सदस्यांमुळे अडचणीत यावे लागले आहे. मात्र व्हॉट्सऍपच्या नवीन सेटिंगमुळे अशा सदस्यांना दावणीला बांधण्याची किमया व्हॉट्सऍपने केलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुले उचलून नेणारी माणसे गावा-गावांत फिरत आहेत, अशाप्रकारचे मॅसेज व्हॉट्सऍपच्या माध्यमातून फिरु लागले होते. माणूस हा लहान मुलांच्या बाबतीत प्रचंड संवेदनशील असतो. परंतू व्हॉट्सऍपवर फिरणार्या या अफवांची कोणीही खातरजमा करण्याची तसदी घेतली गेली नसल्यामुळे अनेकांना आपले जीव हाकनाक गमवावे लागले आहेत. धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात घडलेले हत्याकांडही व्हॉट्सऍप हत्याकांड म्हणून इतिहासात नोंदविले गेले आहे. संवादाचे साधन म्हणून त्या-त्या युगातील व त्या-त्या काळातील लोकांनी नवनवीन साधने शोधून काढली. पूर्वी राज दरबारात निरोप्या असायचा. हे निरोपे पिढ्यान्पिढ्या राजदरबारातील व सधन कुटूंबियांचे निरोप एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहोचवायचे. कोणी पायदळी, तर कोणी घोड्यावरुन निरोप पोहोचविण्याचे हजारो वर्षे इमाने इतबारे करीत असत. कालांतराने कबुतर, ससाणे यांचा वापर मोठ्या खुबीने करण्यात आलेला आहे. ब्रिटीशांनी टेलिफोन भारतात आणला. टेलिफोनबरोबर त्याची तारही आली. पोस्ट खाते अस्तित्वात आले. हजारो वर्षे पारंपारिक पद्धतीने चालत आलेली निरोप्यांची परंपरा खंडित झाली.
भारतात आधुनिकतेचा पाया ब्रिटीशांनी भरला, हे कोणीही नाकारु शकत नाही. काळ झपाट्याने बदलत गेला. त्याप्रमाणेच संवादाची साधनेही बदलत गेली. दोन-अडिच वर्षापूर्वी ज्या तारेने हा समाज हादरुनही जायचा व त्याच्या किमयेने आनंदितही व्हायचा ती तार ऑफिशिअली बंद करण्यात आली. त्यामुळे एका युगाचा अंत झाला. टेलिफोनही मोबाईल फोनच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. येणार्या काही वर्षामध्ये तारेप्रमाणेच या टेलिफोन युगाचाही अस्त होणार आहे. गेल्या दशकभरात संवादाची साधने झपाट्याने बदलली. ई-मेल, पेजर, ऑर्कूट, फेसबुक आणि व्हॉट्सऍप या सोशल मिडियामधील ऍप्लिकेशनने काळानुरुप आपापली स्थाने बळकट केली आहेत. 99 सालानंतर खर्या अर्थाने मोबाईल युग सुरु झाले. उच्चभ्रूंच्या हातात असणारा मोबाईल दशकभरातच सर्वसामान्यांच्या हातात कधी आला, हे कोणालाच समजले नाही. एकेकाळी संवादाचे साधन असलेला मोबाईल मल्टिमिडिया झाला. ई-मेल, यू ट्यूब, सोशल ऍप्लिकेशन्स, लाईव्ह टीव्ही, गेम्स यामुळे मोबाईल ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असे म्हणत मानवी जिवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
सध्या सोशल मिडियातील सर्वच बाबतीमध्ये व्हॉट्सऍप अव्वल आहे. माणूस सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत या व्हॉट्सऍपच्या गारुडाचा गुलाम झाला आहे. किशोरवयीन मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वचजण व्हॉट्सऍपद्वारे जोडले गेले आहेत. कमीतकमी आणि जास्तीतजास्त व्हॉट्सऍप ग्रुपमुळे विनाकारण डोक्याला त्रास वाढलेला आहे. व्हॉट्सऍपवर येणार्या कोणत्याही घटनेची खातरजमा अथवा चिकित्सा न करता तो मॅसेज आहे असा फॉरवर्ड केल्यामुळे अनेक अप्रिय व कायदा व सुवस्थेला बाधा आणतील अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत व घडत आहेत.
त्यामुळे व्हॉट्सऍपनेही या सर्व घोडेबाजाराला पायबंद घालण्यासाठी नव-नवे फिचर्स व सेटिंग्ज उपलब्ध करुन दिले आहेत. पूर्वी व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये समाविष्ट केल्यानंतर सर्वच सदस्य ग्रुपवर पाहिजे त्या पाहिजे अशा पोस्ट टाकू शकत होते. काही अति-रेकी सदस्यांमुळे ग्रुपमधील वातावरण कलुषित व्हायचे. काहीवेळेस वादाचे प्रसंगही उद्भवायचे. अशा कारणांमुळे राज्यात व देशात अनेक मुडदेही पडले आहेत. या सर्व गोष्टींची दखल व्हॉट्सऍपच्या निर्मार्त्यांनी घेतल्यामुळे व्हॉट्सऍपने ग्रुप सेटिंगमधील सेंडिंग ऑप्शनमध्ये केवळ ऍडमिनलाच मॅसेज टाकण्याची मुभा दिल्याची सेटिंग दिल्यामुळे आता फक्त ग्रुप ऍडमिनच ग्रुपवर मॅसेज अथवा पोस्ट टाकू शकणार आहे. त्यामुळे व्हॉट्सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह, अश्लिल मॅसेज व पोस्ट टाकणार्यांना ग्रुपमधून न काढताही चाप लावला गेला आहे. या निमित्ताने व्हॉट्सऍप ग्रुपवरील अति-रेकी सदस्यांची नाकाबंदी झालेली आहे. त्यामुळे ऍडमिन राजा मात्र सुखावला गेला आहे. व्हॉट्सऍपवरही या नव्या सेटिंगमुळे गळचेपी होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला, लोकशाहीची गळचेपी, अशी ओरड होईल. मात्र या सेटिंगमध्ये काही दिवस बघ्यांच्या भूमिकेत असणारे अतिरेकी ग्रुप सदस्य मात्र ‘सरळ’ होतील, अशी आशा बाळगुयात. व्हॉट्सऍपचा विधायक कामांसाठी वापर व्हावा, हीच सदिच्छा!
- संग्राम निकाळजे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |