सातारा : 1994 साली फ्रँक डॅराबोल्ट यांनी दिग्दर्शित केलेला ‘द शशॉन्क रिडम्पशन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक उच्चांक मोडले होते. अमेरिकन चित्रपट इतिहासातील हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. ऍन्डी ड्यूफ्रेन्स या चित्रपटातील नायकाला पत्नीच्या आणि तिचा प्रियकराच्या त्याने न केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऍन्डी ड्यूफ्रेन्स याच्यासारखे अनेक कैदी अमेरिकेतील ओहियो शशॉन्क या कारागृहात नरकयातना भोगत असतानाची कथा या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. 1947 पासून कारागृहात गेलेला ऍन्डी ड्यूफ्रेन्स हा आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तब्बल 20 वर्षे भोगतो. परंतू भ्रष्ट तुरुंग अधीक्षकाकडून कैद्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला जातो, कैद्यांकडून काम करुन घेताना त्यामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार केला जातो, तुरुंग अधिकार्यांच्या मते कारागृहातील कैदी हे माणूस नव्हे तर आमचे गुलाम आहेत. काळ कोठडीत डांबणे, आठवडाभर जेवण न देणे, एखादा कैदी ऐकत नसेल तर पळून जातानाचा बनाव रचून त्याचा एन्काऊंटर करणे या आणि अशा अनेक तर्हा शशॉन्क या कारागृहात अवलंबल्या जात असत.
चित्रपटात वर्णन केलेले शशॉन्क हे कारागृह तसे अभेद्यच. परंतू यातील नायकाने हे अभेद्य असे कारागृह भेदण्याची किमया केली होती. 10 फूट रुंद असलेल्या भिंतीला त्याने छोट्याशा हातोडीने कोरुन कोरुन भगदाड पाडले होते. अशक्य असणारी गोष्ट या नायकाने शक्य केली होती. कारागृहातून पळून गेल्यानंतर मेक्सिकोत जावून त्याने तुरुंगाधिकार्यांच्या व त्यांच्या सहकार्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता. ‘द शशॉन्क रिडम्पशन’सारख्याच घटनांमुळे महाराष्ट्रातील कारागृहे बदनाम होत आहेत. भ्रष्टाचार व राजकीय हस्तक्षेपामुळे अशीच काहीशी परिस्थिती सध्या भारतातील काही कारागृहांमध्ये निर्माण झालेली आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर संबंधित आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होते. त्याने केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त म्हणून न्यायालय त्याला शिक्षा देत असते. किमान ही शिक्षा भोगल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याचा त्याला पश्चाताप होईल व तो शिक्षा भोगून समाजात आल्यानंतर एक चांगले आयुष्य जगेल, ही यामागची ढोबळ संकल्पना असते. परंतू भारतातील भ्रष्ट झालेले कारागृह प्रशासन ब्रिटीशांनी शिकवलेल्या सर्व गोष्टी विस्मृतीत गेल्यासारखे वागत आहे. अनेक गंभीर गुन्ह्यात कारागृहात असणार्या कैद्यांना व्ही व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते. पैशाच्या जोरावर अनेक आरोपी कारागृहामध्ये राहून लॅविश लाईफस्टाईल जगत असतात. कारागृहातच राहून ते आपले बाहेरचे साम्राज्य चालवित असतात. भारतातील प्रत्येक कारागृहात कमी अधिक प्रमाणात असे प्रकार सर्रास चालत असतात. परवा वाई येथील सिरीयल किलर व कथित डॉक्टर संतोष पोळ याने कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात पिस्तुल सदृश्य वस्तू कंबरेला खोचत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. कारागृहात चक्क पिस्तुल सदृश्य वस्तू आढळल्याने कारागृह प्रशासन पुरते हादरुन गेले होते. कळंबा सारख्या ब्रिटीशकालीन अभेद्य कारागृहात पिस्तुल आणि कॅमेरा गेलाच कसा? यामुळे कळंबा कारागृह प्रशासन किती भ्रष्ट आहे, याचा अंदाज येवू शकतो. तीच परिस्थिती पुण्यातील येरवडा कारागृहाची आहे.
सातारा शहरात असणारे ब्रिटीशकालीन मध्यवर्ती कारागृह गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचे विषय ठरले आहे. क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांनी हे ऐतिहासिक कारागृह भेदण्याची किमया केली होती. यानंतर आजतागायत हे कारागृह कोणीही भेदल्याचे ऐकिवात नाही. असे असताना या कारागृहात छोट्या मोठ्या भानगडी सुरु असतात. सातारा जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो. साहजिकच जिल्ह्यातील क्राईमरेट कमी आहे. असे असूनही अधुनमधून जिल्ह्यात गंभीर स्वरुपाच्या घटना घडत असतात. त्यामुळे अनेक व्हाईट कॉलर गुंडांना सातारामधील कारागृहात जाण्याची संधी उपलब्ध होते. राज्यातील कळंबा व येरवड्याच्या तुलनेत सातारा कारागृह अगदी दुय्यमच. याठिकाणी न्यायालयीन कोठडीत असणारे अनेक आरोपी ठेवलेले असतात. ज्यांना शिक्षा झाली आहे, अशांना कळंबा किंवा येरवडा कारागृहात पाठविले जाते. असे असताना गेल्या काही वर्षांमध्ये सातारा कारागृह भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. या कुरणात कारागृह प्रशासनातील अनेक अधिकारी स्वच्छंदपणे चरत असतात. एखाद्या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली की इकडे यांचा ‘मिटर’ सुरु झाला. सातारा कारागृहात दाखल होतोय न होतोय तोच अनेक आरोपींच्या छातीत कळ मारायला सुरुवात होते. कोणाचा रक्तदाब वाढतो, तर कोणाची पाठ चमकते. लागलीच नोटांची भेंडोळी सरकवल्यानंतर सातार्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मध्ये असणार्या प्रिझन वॉर्डमध्ये संबंधित आरोपीची रवानगी केली जाते. जिल्ह्यातील अनेक उलट्या काळजाचे गुंड, पुढारी या प्रिझन वॉर्डमध्ये सरकारी पाहुणचार घेतात. यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरही ‘मापात पाप’ करीत असतात. गरीबाला वाली नसतो परंतू श्रीमंताला हवाली असतो, अशी परिस्थिती सातारा जिल्हा कारागृह प्रशासनाची झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच कारागृहातील कैद्यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. कारागृहात कोणत्याही प्रकारच्या आरोपी सुविधा मिळत नाहीत. सिव्हिलमधील डॉक्टर कागदावरच आपली कारागृहाची वारी दाखवित असतात. त्यामुळे सातारा जिल्हा कारागृहातील अनेक कैद्यांना गंभीर स्वरुपाच्या रोगांची लागण झाल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
सिव्हिल,पोलीस व कारागृह प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव असतो. या दबावामुळेच या तिनही प्रशासनातील अधिकारी लोकशाहीसाठी अभिप्रेत असणार्या गोष्टी अंमलात आणत नाहीत. परवा फलटण पंचायत समितीच्या सदस्या जयश्री दिगंबर आगवणे यांना पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक झालेली आहे. त्यांच्या बरोबर काही महिलाही आहेत. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी सातारा कारागृहात करण्यात आली होती. यानंतर सौ. आगवणे यांना मान व पाठदुखीचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सौ. आगवणे या सिव्हिलमध्ये गेल्याचे कळताच फलटण नरेशांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. लागलीच फलटण नरेशांनी कारागृह अधीक्षकांसह जिल्हा शल्य चिकित्सकांनाही चांगलेच फैलावर घेतले असल्याची चर्चा (ऑफ द रेकॉर्ड) आहे.
फलटण नरेशांच्या थेट हल्ल्यामुळे कारागृह अधीक्षकांसह जिल्हा शल्य चिकित्सकांनी आपापल्या पातळीवर तातडीने बैठक घेवून जयश्री आगवणे यांना पुन्हा कारागृहात पाठविण्यासाठी हालचाली सुरु केल्या. अखेर जयश्री आगवणेंची रवानगी पुन्हा एकदा कारागृहात करण्यात आली. परंतू हिच मानसिकता अधिकार्यांनी इतर आरोपींच्या बाबतीत ठेवली, तर जिल्हा कारागृहातील एकही आरोपी प्रिझन वॉर्डमधील पाहुणचार झोडायला जाणार नाही. आगवणेंच्या प्रकरणात तिनही प्रशासन बॅकफुटवर आलेले आहेत. कारागृह व सिव्हिल प्रशासनाला फलटण नरेशांच्या दट्ट्यामुळे सौ. आगवणे यांना पुन्हा एकदा कारागृहात पाठविण्यात आले. भविष्यात फलटण नरेशांच्या आदेशाने एखाद्या कैद्याचा मर्डरही केला जावू शकतो, अशी शक्यता नाकारता येवू शकत नाही. कळंबा, येरवडा किंवा सातारा मध्यवर्ती कारागृह हे अधिकार्यांच्या भ्रष्टाचारामुळे बदनाम झाले आहे. या तिनही कारागृहांची द शशॉन्क रिडम्पशन चित्रपटातील कारागृहाप्रमाणे अवस्था झालेली आहे. वाचकांनी वेळ मिळाल्यास द शशॉन्क रिडम्पशन हा चित्रपट जरुर पहावा. जेणेकरुन आपणास कळंबा, येरवडा व सातारा येथील कारागृहांमधील वस्तुस्थिती लक्षात येईल.
- संग्राम निकाळजे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |