सातारा : विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएसच्या अॅडमीशनसाठी नीट परिक्षा देणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने नीटचा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे, ते मोबाईलशी लिंक असणे बंधनकारक केले आहे.
मात्र जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपडेटची प्रोसेस करुनही ते अपडेट होत नाही. अनेकांचे मोबाईल नंबर आधारशी लिंक होत नाहीत. त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आधारच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातही हेलपाटे घातले.
मात्र काहीच कार्यवाही होत नाही. त्यातच निटचे अर्ज भरण्याची मुदत दोनच दिवस म्हणजे शनिवारीपर्यंतच (ता. १६) आहे. त्यामुळे नीटच्या परिक्षेपासुन अशा अनेक विद्यार्थ्यांना वंचीतच रहावे लागणार असल्याने ते व त्यांचे पालक हवालदील झाले आहेत.
नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत नीटची परीक्षा घेतली जाते. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांचे देशभरातील प्रवेश नीटमधील गुणांच्या आधारे केले जातात.
परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि विद्यार्थ्यांचे रॅँकिंग देण्याचे काम एनटीएच्यावतीने केले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार इंग्रजी आणि हिंदीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळी, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. यंदाही ही परिक्षा पाच मे २०२४ रोजी होणार आहे.
त्यासाठी ९ मार्च २०२४ पर्यंत २२ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची नोंद एनटीएकडे झाली आहे. या परिक्षांसाठी अर्ज भरण्याच्या नियम व अटीमध्ये यंदा आधार कार्ड अपडेट असणे, ते मोबाईलशी लिंक असणे एनटीएने बंधनकारक केले आहे.
त्यानुसार हे फॉर्म भरावे लागत आहेत. अर्ज भरायला गेल्यावर आधार कार्ड अपटेड करा असे सांगीतले जाते. ते अपडेटसाठी गेल्यावर तेथे अपडेटची सर्व प्रोसेस करुनही ते अपडेट होत नाही. चार-चार महिने त्यासाठी विद्यार्थी, त्यांचे पालक खटपट करत आहेत. त्याचबरोबर अनेकांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक होत नाही.
त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आधारच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातही हेलपाटे घातले आहेत. तरीही काहीच कार्यवाही होत नसल्याने पालकही हतबल झाले आहेत. त्यातच निटसाठी फॉर्म भरण्याची मुदत शनिवारीपर्यंत आहे. त्यामुळे नीटच्या परिक्षेपासुन अशा अनेक विद्यार्थ्यांना वंचीतच रहावे लागुन त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एनटीएकडे अनेक तक्रारी दाखल :
केंद्रीय शिक्षण विभागाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यंदा नीट परिक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी असलेल्या नियम व अटीमध्ये आधार कार्ड अपडेट असणे, ते मोबाईलशी लिंक असणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत.
ते अपडेट झाले तरी त्यांचे मोबाईल आधारशी लिंक होत नाहीत अशा तक्रारी केंद्रीय शिक्षण विभागाकडे दाखल झाल्याचे एनटीएच्या दिल्लीतील कार्यालयातुन सांगण्यात आले. त्यामुळे ज्यांच्या अशा तक्रारी आहेत त्यांच्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अन्य पर्याय देण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत. त्याचबरोबर ते मोबाईशीही लिंक होत नाही. त्यासंदर्भात अनेक पालकांनी माझ्याकडे धाव घेतली आहे. मी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहुन या अटीमध्ये बदल करावा किंवा त्याला अन्य काही पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती केली आहे. - श्रीनिवास पाटील खासदार, सातारा
नीटचा फॉर्म भरण्यासाठी यंदापासुन आधारकार्ड लिंक असणे बंधनकारक केले आहे. अर्ज भरायला गेल्यावर आधार अपडेट करायला सांगीतले. ते अपडेट करण्याची कार्यवाही मी डिसेंबर २०२३ रोजी पुर्ण केली. तरीही आधार नंबर नॉट व्हॅलीड असेच येत आहे. त्यामुळे त्याचा नीटचा अर्ज भरता येत नाही. त्यासाठी मी मुंबईतील राज्यातील आधारच्या मुख्य कार्यालयात गेलो. मात्र तेथेही होईल-होईल असे सांगतीले. त्याला आज चार महिने झाले तरीही काहीही झालेले नाही. त्यामुळे माझ्या मुलाला या नीटच्या परिक्षेपासुन वंचीत रहावे लागुन त्याचे वर्ष वाया जाणार आहे. - ब्रह्मदेव वाघमोडे पालक, गोडोली-सातारा
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |