शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणामध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार करण्यात आला आहे. या नवीन आराखड्यानुसार, बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण मिळवण्याची संधी मिळेल. वर्षातून एकदाच बोर्डाची परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येतो, हा ताण कमी करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल उचलल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी जाहीर केलं की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, नवीन अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ साठी पाठ्यपुस्तकंही विकसित केली जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. यातील एक भारतीय भाषा असेल. हा निर्णय केवळ भाषिक विविधता आणण्यासाठी नव्हे तर देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी घेतला आहे, असं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये म्हटलं आहे. “विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी. त्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी, या हेतुने वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा घेतल्या जातील. ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते परीक्षेसाठी तयार आहेत, असं जेव्हा विद्यार्थ्यांना वाटेल. तेव्हा त्याच विषयांच्या परीक्षेसाठी विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतील,” असंही नवीन अभ्यासक्रम आराखड्यात म्हटलं आहे.
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |