सातारा : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. असे असताना सातारा जिल्ह्यात लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, तो निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. सातारा लोकसभेची जागा प्रथमपासूनच राष्ट्रवादीकडे आहे. त्यांच्याकडूनच कोणाला उमेदवारी द्यायची, ते ठरणार आहे. सातारा जिल्हा हा देशाला दिशा देणारा जिल्हा आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ जातीयवादी विचारांच्या उन्मादींकडे कधीही जाऊ देणार नाही, असा निर्धार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे बोलून दाखवला.
महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असला तरी आम्ही ताकदीने तो उमेदवार निवडून आणणार आहोत, अशीही भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली. काँग्रेसच्या कराड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आज घेण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सांगलीच्या महाविकास आघाडीच्या जागेवरून वाद सुरू आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘‘सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, ही तेथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे. शिवसेनेनेही तेथे मागणी केली आहे. वरिष्ठ पातळीवर दिल्लीला त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातून योग्य निर्णय होईल.’’ महाविकास आघाडीतून वंचित बाहेर पडले आहे, असे खासदार संजय राऊत म्हणत आहेत. त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘वंचित आघाडीने ठराविक ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातील जी मते आहेत, त्याची विभागणी होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. मात्र, ते होताना दिसत नाहीत.’’
साताऱ्याच्या जागेबाबत आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी द्यायची, तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडून उमेदवार ठरवण्याचे काम सुरू आहे. जातीयवादी विचाराकडे कधीही सातारा लोकसभेची जागा गेलेली नाही आणि आम्ही ती जाऊनही देणार नाही, असा निर्धार केल्याचे आमदार चव्हाण यांनी जाहीर केले. महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही ताकदीने निवडून आणणार आहोत, असेही ते म्हणाले.
सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी व जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केली. या वेळी त्यांनी बाबांची स्वच्छ प्रतिमा आहे. देशाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यांच्याविरोधात कोणीही उभे राहिले तरी तो निवडून येणार नाही. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना लोकसभा निवडणूक उमेदवार म्हणून संधी द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |