मेढा: केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली आहे. 1991 पासूनच्या तिन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहे. केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्केच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे.
जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षापूर्वीच बंद पडला असून भागातील दुग्धव्यवसाय पुर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरूण वर्ग शहरात स्थलांतरित होतोय. येत्या काळात पाण्याची व्यवस्था न झाल्यास हा संपूर्ण भाग लवकरच निर्मनुष्य होण्याची भीती आहे. या भागातील प्रत्येक गावात आतापर्यंत चार ते पाच पाणीपुरवठा योजना झाल्यात. गेल्या 15 ते 20 वर्षात पाणलोट, जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कोट्यावधी रुपये शासनाने खर्च केले आहेत.
केळघर, डांगरेघर, भामघर येथे तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावर दोन अडीच कोटी खर्च झाले. मात्र त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाहीच. 54 गावांना शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण हाच एकमेव उपाय आहे. या धरणासाठी गेली 12 वर्ष प्रयत्न चालू आहेत. त्यातही बोंडारवाडी धरण कृती समिती गेली 8 वर्ष धरणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. तीन वर्षांपूर्वी या धरणासाठी पाणी परवाना मिळाला आहे. किती भूसंपादन करावे लागणार व धरणरेषा याचा सर्वे पुर्ण झाला आहे. आता ट्रायल पिट करून प्रस्ताव प्रशासकीय मंजूरीसाठी पाठवण्याची आवश्यकता असताना शासनाने बोंडारवाडी धरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले आहे. याचा अर्थ यापूर्वी झालेले धरणाबाबतचे निर्णय रद्दबातल ठरतात. कृती समिती या शासन आदेशाचा निषेध करते.
जी.आर. रद्द करून बोंडारवाडी धरणास तातडीने प्रशासकीय मंजूरी न दिल्यास कृतीसमिती 54 गावांचे तीव्र आंदोलन उभारेल. त्यामधे महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असा इशारा कृतीसमितीच्या निमंत्रक व सामाजिक कार्यकर्त्या उषा ऊंबरकर यांनी दिला आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |