11:18am | Feb 29, 2024 |
कराड : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पत्रकारांनी केवळ जुंपलेला लेखक होऊ नये. साहित्यिक व पत्रकार यांच्यात एका पावलाचे अंतर असून ते मिटवण्यासाठी पुढे होणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात रोज काहीतरी नाविन्य येत गेले. पत्रकारितेत केवळ आधुनिकता आली, मात्र नाविण्याचा अभाव आहे. यासाठी पत्रकारांनी लेखनात भाषविविधतेचा अवलंब करणे काळाची गरज आहे. शब्दांच्या खोडय़ा कळल्या की शब्दांच्या माडय़ा सहज बांधल्या जातात, असे मार्गदर्शन लेखक सज्जन यादव यांनी केले.
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त इंद्रधनू विचारमंच फौंडेशनच्या वतीने ‘प्रभावी पत्रकारितेसाठी शब्दांचे सामर्थ्य' या विषयावर कार्यशाळा कराड नगरपरिषद शाळा क्रमांक नऊमध्ये स्वर्गीय पी. डी. पाटील सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरिता घारे या होत्या. या कार्यशाळेत पत्रकार चंद्रजित पाटील व विश्वास मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
आधुनिकतेच्या अंगिकारात व अहंकारात आपण आपल्या मायबोलीचे सौंदर्य, सामर्थ्य व महती विसरत चाललो आहोत. कोणतीही भाषा शिकावी लागते पण मराठी भाषा ही शिकवणारी आहे. हा आपल्या भाषा ज्वलंत असा जिवंतपणा आहे. मराठी भाषेचे वय 1500 वर्षाहून अधिक आहे. पूर्व वैदिक, वैदिक, संस्कृत, पाल, प्राकृत आणि देवनागरी अशी भाषा प्रगत होत गेली. जगात दहाव्या व देशात तिसर्या क्रमांकाची आपली मराठी भाषा आहे. ती जागतिक जरी नसली तरी अगतिक आहे. प्रागतिक आहे. समाजाच्या मानसिक वैचारिक विकासामध्ये, साहित्यिक, सामाजिक व स्वातंत्र्य चळवळीमध्ये मराठी भाषेचे योगदान मोठे राहिले आहे. थोर साहित्यिकांनी भाषेचा हा प्राचीन समृद्ध वारसा जपला पण वाचन संस्कृती लोप होत चालल्यामुळे भाषेच्या या वैभवाचा वारसा जतन करणे कठीण काम बनलेले आहे. खिन्न समाज व भिन्न समाज यावर साहित्यिकांची भेदक नजर सदैव खिळलेली असते. त्यातूना अनेक विकल्प त्यास मिळतात आणि साहित्य निर्मितीचे प्रकल्प आणि संकल्प पुरे होत असतात, असे ते म्हणाले.
पत्रकार देवदास मुळे म्हणाले, माणसाच्या जीवनात शब्दांना अतिशय महत्व आहे. भाषा ही संवादाचे साधन मानली जाते. असं म्हणतात युद्धे शस्त्रांनी जिंकली जातात पण या युद्धांचे तह शब्दांनी होत असतात. इतके शब्दांना महत्व आहे. बातमी लिहताना ती साध्या शब्दांत, वाचकांना चटकन समजेल अशा शब्दांत लिहावी, हे अपेक्षित असते. मात्र अवांतर लिखाण, स्तंभ लिखाणात आपल्या शब्द सामर्थ्याचा कस लागतो. आज तर इलेक्ट्रिक, डिजिटल व सोशल असा माध्यमांचा विस्तार झाला आहे. अशा परिस्थितीत आपले लेखन कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अमर्याद संधी उपलब्ध झाल्या असताना चपखल भाषेचा वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे. परिणामकारक भाषेचा वापर केला पाहिजे.
सरिता घारे, सचिन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद सुकरे यांनी कविता सादर केली. शाळा क्रमांक नऊच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शशिकांत पाटील, सतीश मोरे, प्रमोद सुकरे, सागर बर्गे, मुख्याध्यापक अरविंद पाटील, राहुल पुरोहित, विकास भोसले, विशाल देशपांडे यांनी प्रतिमा व ग्रंथ पूजन केले. अशोक मोहने यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद तोडकर यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले. संदीप चेणगे, सुभाष देशमुखे, सुहास कांबळे, नितीन ढापरे, सकलेन मुलाणी, सर्फराज मुल्ला, अक्षय मस्के यांनी सत्कार केले. माणिक डोंगरे यांनी आभार मानले.
संमिश्र वाचनावर भर द्यावा :
वाचन हे संमिश्र असं असावं. मोठय़ा ग्रंथांतून लेखकी क्षमता, प्रतिभा, प्रगल्भता कळत असली तरी शब्दभांडार, प्रासंगिक विषय व विविध शैली याच्या आकलनासाठी छोटी पुस्तका अधिक उपयुक्त ठरतात व किमान वेळेत ती वाचूनही पूर्ण होतात. याबरोबरच मराठी विश्वकोश, पर्यायी शब्द, ग्रामभाषेतील शब्द यांचा वापर पत्रकारांनी केला पाहिजे. वाचनासाठी वेळ दिला पाहिजे. त्यातही काय वाचले पाहिजे, हेही ठरवले पाहिजे, असे सज्जन यादव यांनी सांगितले.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |