12:07pm | Mar 12, 2021 |
फलटण : सद्यपरिस्थितीत जिहे-कठापूर बॅरेजचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. 20-21 मध्ये 0.35 टीएमसी पाणी साठा करण्याचे नियोजन आहे. 2022-23 मध्ये ही योजना पूर्ण कार्यान्वित करुन 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली निर्माण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून 100 टक्के निधी प्राप्त व्हावा, अशीही मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांना दिली.
दिल्ली येथे खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व त्यांच्या पत्नी जि.प. सदस्या ऍड. जिजामाला ना. निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी माढा मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. मोदी यांनीही चर्चेदरम्यान सकारात्मक प्रतिसाद दिला.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची माहिती देताना खा. निंबाळकर म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, फलटण -पंढरपूर रेल्वे, नीरा देवघर प्रकल्प, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर), माढा मतदारसंघातील तरुण ,बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
या प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 22 दुष्काळी जिल्ह्यांना लाभ होणार आहे. कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कर्नाटकला न जाता ते अडवल्यास सिंचनाच्या व पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. ही योजना पूर्ण झाल्यास 110 टी एम सी पाणी महाराष्ट्राला जादा मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण या दुष्काळी भागा बरोबर सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा या भागातील पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच ही योजना पूर्ण होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जनता व कर्नाटक सरकार अनुकूल आहेत. परंतु हा प्रकल्प मोठा असल्याने सध्याचे सरकार तो गांभीर्याने घेत नाही. आपण यामध्ये लक्ष घालून या प्रकल्पास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खा. निंबाळकर यांनी केली.
ब्रिटिश काळापासून फलटण पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. याबाबत ब्रिटिशांनी रेल्वेचे सर्व्हेक्षणाचे काम सुद्धा पूर्ण केले आहे. फलटणपर्यंत रेल्वेचे काम पूर्ण झाले आहे. पुढील फलटण ते पंढरपूर रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यास तीर्थ क्षेत्राबरोबरच या भागाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होईल. तसेच बेरोजगारीचा प्रश्न ही मार्गी लागेल. हे काम पूर्ण होण्यास राज्य शासनाकडून पक्षपातीपणाची भूमिका घेतली जात आहे. यामध्येही आपण लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा. तसेच नीरा देवघर या धरणावरील कालव्यांची कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास दुष्काळी पट्ट्यातील खंडाळा, फलटण, माळशिरस सांगोल्यातील काही भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेस कमीत कमी 1 हजार करोडची आवश्यकता आहे. तरी आपण या योजनेस निधी उपलब्ध करुन द्यावा. या योजनेचे 21 वर्षांमध्ये फक्त 65 किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. या मतदार संघाचे यापूर्वी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी नेतृत्व केले आहे. परंतु हा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक सोडलेला नाही. याउलट त्यांनी हे पाणी बारामती मतदारसंघाकडे नेले. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात हे पाणी पुन्हा या दुष्काळी पट्ट्यातील जनतेला देण्यात आले होते.परंतु राज्यांमध्ये सत्ताबदल झाला आणि हे पाणी पुन्हा बारामतीकडे नेण्यात आले आहे. तरी याबाबत मूळ नीरा-देवघर प्रकल्पास निधीची आवश्यकता आहे तो आपण पूर्ण करण्यासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच माण खटाव तालुक्यातील दुष्काळी भागासाठी गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) केंद्रशासनाच्या जल शक्ती मंत्रालया मार्फत राबवली जात आहे. यामध्ये माण, खटाव तालुक्यातील 6% दुष्काळी गावांचा समावेश आहे. या प्रकल्पामध्ये 2% हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी 1061.34 कोटी अंदाजे खर्च अपेक्षित आहे. त्यास शासनाने मान्यता दिली आहे त्याबाबतचा निधीही प्राप्त झाला आहे. 2020 अखेर या प्रकल्पावर 58%.68 इतका खर्च झाला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |