प्रकाश राजेघाटगे
बुध : ग्रामीण भागातुन पोटांसाठी कष्ट करणारे गोरगरीब नागरिक आपल्या लेकरा बाळांचे पोट भरण्यासाठी पुणे, मुंबई, पनवेल, कल्याण आदी मोठ मोठया शहरामध्ये गाव सोडून दुसर्या ठिकाणी काम करत असणारे नागरिक आत्ता गावाकडे येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसापासून या शहरामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत चालल्याने त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी हे नागरिक आपाआपल्या गावाकडे परतत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. त्यामूळे कोरोना व्हायरस पासून बचाव होण्यासाठी गडया, आपला गावच लय भारी असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव देश-विदेशातून ये-जा करणार्या नागरिकांमुळे शहरी भागात या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गावाकडील शेती व्यवसायात आलेल्या तोटा वाढत्या बेरोजगारीमुळे आपल्या गरजा भागविण्यासाठी शहराकडे धाव घेतलेल्या या नागरिकांना कदाचित आपणही या संकटात सापडू, असा भितीयुत्क विचार करीत धास्तीने नागरिकांना आपले जन्मगाव दिसू लागले आहे. तसेच राज्यभरातील सर्वाधिक रूग्ण शहरात आढळले आहेत. त्यामुळे सर्वत्र भिती युत्क वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून करण्याची योग्य ती खबरदारी घेण्यासाठी म्हणून शाळा, कॉलेज, महाविदयालय, हॉटेल, सरकारी कार्यालय, उद्यान, जिम्स, कारखाने, कंपन्या बंद करण्यात आली आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ, मॉल बद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नोकरीची आणि मुलाच्या शाळा बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर चारशे -पाचशे किलोमीटर अंतरावर शहरात गेलेल्या नागरिकांना रोजगाराचा प्रश्न उपलब्ध झाला आहे. रोजगार नसल्यामुळे भाडयाच्या घरात राहून तेथील लाईट बिल्स इतर विविध कामासाठी पैसे खर्च करणे, पोट भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना परवडणार नाही. शिवाय कोरोना होण्याची धास्ती आहेच.
भल्याभल्यांनाही आठवतेय गाव
कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर तो आपल्याला परवडणार नाही, म्हणून हातावर पोट असणारे अनेक नागरिक आपापल्या गावाकडे परतत आहेतच, पण मोठमोठे उद्योग थाटून शहरात स्थिरस्थावर झालेले झालेले आणि कधीच गावाकडे न फिरणार्यांना सुध्दा कोरोनाच्या भितीमुळे गाव आठवत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग गावाकडे जाणार्या गाड्या मोठ्या प्रमाणात होत आहे. अशी खासगी वाहने सुध्दा गावाकडे धावताना पहायला मिळत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |