02:05am | Aug 27, 2019 |
सातारा : कराड येथील सोळवंडे खून प्रकरणी आत्तापर्यंत १४ आरोपींना जेरबंद केले आहे. या गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेल्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषता जिल्ह्यात टोळीयुद्ध भडकू नये याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, महामार्ग कडेला घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सातारा तालुका पोलीस ठाण्यात असणाऱ्या शिवतेज हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील यावेळी उपस्थित होते.
सुहास वारके पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. विषेशता मोक्काच्या कारवाईला प्राधान्य दिल्यामुळे त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली पूरस्थिती जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली. महामार्गावर अडकून पडलेल्या विविध राज्यांच्या ट्रक चालकांना जेवणासह विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात पोलिसांनी पुढाकार घेतला. राज्यामध्ये काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना सातारा जिल्ह्यात मात्र विविध गणेश मंडळांनी पूरग्रस्तांना मदतीची भूमिका घेतली आहे. काही मंडळांनी गावे दत्तक घेतली आहेत. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मोहरम याच काळामध्ये येत असल्यामुळे त्यानुषंगाने पोलीस आणि शांतता कमिटीची बैठक झाली असून मोहरम नतंर दुर्गा उत्सव, विधानसभा निवडणुकांची तयारी पोलीस प्रशासन हाती घेणार आहे. कराड येथील सोळवंडे खून प्रकरणी बोलताना सुहास वारके पुढे म्हणाले, या खून प्रकरणानंतर लगेचच पोलीस संशयितांच्या मागावर होते. आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणांमध्ये सहभागी असणाऱ्या अन्य काही जणांचा शोध सुरू आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर टोळीयुद्ध भडकू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी गुन्हे दाखल असणार्या संशयितांवर कारवाई करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मुखाच्या ४० प्रस्तावांना आत्तापर्यंत मंजुरी दिली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, यासंदर्भात आता कोणताही प्रस्ताव पेल्डिंग नाही. जिल्ह्यामध्ये निर्भया पथकाच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. पुढील काही काळामध्ये महाविद्यालयांमध्ये मुलामुलींच्या मध्ये जागृती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सायबर गुन्हे यावर भाष्य करताना ते म्हणाले, अनेकदा सायबर गुन्हे घडत असतात मात्र अशावेळी काय करावे हे कळत नसल्यामुळे नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये तसेच युवक-युवती मध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये कॅम्पस घेण्याचा माणस आहे. महामार्गाला लागून असणाऱ्या गावांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प आहे. त्यामुळे महामार्ग यावर घडणाऱ्या गुन्हासंबंधी घटनांवर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे. महामार्ग कडेला असणाऱ्या ग्रामपंचायती आणि धाब्यांना त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |