लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४१ लाख मते घेतल्यामुळे महाराष्ट्रभरातील प्रस्थापितांना विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबर हादरा बसलाय. संभाव्य विधानसभा निवडणुकीत पुन्हा हादरा बसू नये अशी भावना काँग्रेस गोटात उफाळून येतेय. तथापि, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा वंचितसोबत पोलिटिकल सामंज्यस करून जवळीक साधतील किंवा यासाठी वंचितचे सुप्रिमो स्वतः प्रयत्नशील राहतील असं, सद्यातरी चित्र दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकलीय. काहीजण तर धास्तावलेल्या अवस्थेत भाजपाच्या वाटेवर असल्याचेही पहावयास मिळत आहे.
साता-यात वंचितला ४० हजार मते मिळालीत. हा आकडा ईव्हीएम मशिनचा आहे. वास्तविक दोन ते सव्वा दोन लाख मते पडल्याचा खात्रीपूर्ण दावा वंचितचा आहे. एका महत्वपूर्ण सर्व्हेक्षणानुसार सातारा लोकसभा मतदार संघात कपबशी खणखणत होती. ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांच्या रुपाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरच पुन्हा आपल्यासमोर आलेत, अशी इलेक्शन दरम्यान लोकभावना झाली होती. साता-याबाहेर असणारी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, अमरावती, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, नाशिक अशा भागातून कुटुंबच्या कुटुंबे गाड्या करुन मतदानाच्या आदल्यादिवशीच साता-यात दाखल झाली होती. भारतीय बौद्ध महासभेने यासाठी विशेष प्रयत्न केले होते. इतर काही आंबेडकरवादी विचाराच्या पक्षांनी व गटातटांनीही वंचितला मतदान केलंय. इतकेच नव्हेतर दस्तुरखुद्द राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन वंचितसाठी निवडणूक निधी देत आंबेडकरांप्रती असणारी निष्ठा कायम राखली. वोट बँक समजला जाणारा ओबीसी आणि काही प्रमाणात मुस्लिम सुध्दा वंचितसोबत राहीला, ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरीही साता-यात ४० हजाराचा आकडा मशीन ओलांडू शकली नाही. मग, प्रश्न असा निर्माण होतो की, जवळपास पावणेदोन लाख मतं गेली कुठे ? याचा सरळ अर्थ मशीनने धोका दिलाय, गडबड घोटाळा केलाय हे उघड आहे. नव्हेतर, तशी चर्चा आहे !
खरंतर, ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून ईव्हीएम मशीनबाबत शंका घेत आक्रमक पवित्रा धारण केलाय. एकाचवेळी महाराष्ट्रभर 'घंटानाद' करून ईव्हीएम नको, बॕलेट पेपर हवा असा आंदोलनात्मक नाराही दिलाय. या आंदोलनाने ॲड. बाळासाहेब आंबेडकर शरद पवारांच्या एक पाऊल पुढे असल्याची चर्चाही जोरदार झडलीय. या पार्श्वभूमीवर आता मशीनबाबत ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन, पाठबळ आणि पाठिंबा मिळत असून सर्व थरांतून स्वागत होत आहे. मध्यंतरी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित पक्षांचे महत्वाचे दहा ते बारा मोहरे आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला होता, तेव्हापासून 'त्या' प्रस्थापितांच्या छावणीत प्रत्येकजण एकमेकांकडे शंकेने पाहू लागलाय. सारांश, वंचितला सहज घेऊन वा दूर्लक्षून चालणार नाही. वंचितचा उमेदवार निवडून येईल की नाही, हे अस्पष्ट असले तरी अगदी पाच सहा हजाराने तो आपल्याला पाडू शकतो, हे स्पष्ट असून याचे एक नवं आकलन दोन्ही काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना नकळत येऊन गेलंय. किंबहुना, त्यामुळे वंचितला सोबत घ्या असा 'आतून' दबाव वाढलाय. अर्थात ही 'अंदर की बात' बाहेर कोणाला माहित नाही असे नाही. असो !
आता, काँग्रेसचे पानीपत कसं झालं, हे नव्याने इथं सांगायची गरज नाही आणि सद्या फुटीच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादी कशी आहे याची चर्चा रंगवण्यात किंवा दोन्ही काँग्रेसला भाजपाने कसं पुरते पोखरलंय यावर बोलण्यातही काही अर्थ नाही. एक मात्र निश्चित. दोन्ही काँग्रेसचा कॉन्फिडन्स लूज झालाय, हे निर्विवाद सत्य आहे. तेव्हा वंचितला टाळून पुढे जाणं धोक्याचे ठरू शकते. किंबहुना तो 'ओव्हर कॉन्फिडन्स' घात करू शकतो, या भीतीने विद्यमान आमदारांचे भवितव्य धास्तावून गेलंय. त्यामुळेच की काय पांढ-याशुभ्र खादीतले बलदंड काँग्रेसी चेहरे आतून अक्षरशः भेदरलेत !
- अ रु ण वि श्वं भ र
+९१ ९८ २२ ४१ ५४ ७२
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |