02:22am | Aug 06, 2019 |
सातारा : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने क्रांतीकारी निर्णय घेवून जम्मू आणि काश्मिरमध्ये खर्या अर्थाने शांतता प्रस्तापित करण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 370 कलम लागू होते. हे कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्यास राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. या ऐतिहासिक निर्णयाचे मी सातारा जिल्हावासियांच्यावतीने स्वागत करतो आणि मोदी सरकारने हा निर्णय घेवून सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांना खर्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण केली, याबद्दल सरकारचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानतो, अशी भावनिक प्रतिक्रीया शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील हजारो युवक सैन्यदलात सेवा बजावत असून असंख्य जवानांना देशाचे रक्षण करताना सीमेवर वीरमरण आले आहे. अनेक जवान अतिरेकी हल्ल्यांमध्ये शहीद झाले आहेत. जम्मू काश्मिर हाच दहशतवादाचा मुख्य मुद्दा असून आज मोदी सरकराने जम्मू आणि कश्मिरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून लागू असलेले 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. काश्मिरसाठीची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात आणला असून देशाची अखंडता अबाधित ठेवणारा असा निर्णय भाजपा सरकारने घेतला आहे. आता काश्मिर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्र शासीत प्रदेश झाले असून खर्या अर्थाने हे प्रदेश देशाच्या सर्वोच्च संसदेच्या अखत्यारित आले आहेत. यामुळे नेहमीच अशांत समजल्या जाणार्या या प्रदेशांमध्ये खर्या अर्थाने शांतता नांदण्यास सुरुवात झाली असून नरेंद्रजी मोदी सरकारच्या या निर्णयाचा मला अभिमान आहे.
आजपर्यंत जम्मू आणि काश्मिरमध्ये सातारा जिल्ह्यातील असंख्य जवानांना वीर मरण आले आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक जवान शहीद झाले आहेत. भाजपा सरकारने घेतलेल्या या अभुतपुर्व निर्णयामुळे आमच्या सातारा जिल्ह्यातील शहीद वीर जवानांना खर्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण झाली असून याबद्दल तमाम जिल्हावासियांच्यावतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकारचे अभिनंदन करतो, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |