सातारा : सातारा जिल्ह्यातील बागायतदार गाव अशी ख्याती असलेल्या लिंब गोवे परिसरात पेरु फळानंतर आंब्याची मोठी लागवड केली जाते. सध्या अनेक जातीची आंब्याची झाडे मोहरले असून काही आंबे पिकलेले आहेत. पण आंबे काढण्यासाठी गडी मिळत नसल्याने अडीच हजार डझन आंबे फांदीवर लटकून राहिले आहेत. हे आंबे उतरवण्यासाठी मजूर मिळत नाहीत. हे आंबे वेळेत उतरवले नाहीत तर शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ शासनावर येईल, अशी भीती लिंब गावचे प्रगतशील शेतकरी शिवाजीराव सावंत- पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजप सरकारने अशा शेतकर्यांसाठी एखादी योजना कार्यान्वित करावी, अशीही मागणी केली आहे.
सातारा तालुक्यात राजकीयदृष्ट्या प्रगत असलेल्या लिंब गावच्या हद्दीतून पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे येथील शेती उत्पन्नाला पुणे-मुंबई, नवी मुंबई येथे नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. सध्या दररोज किमान 20 गाड्या भरुन शेतीमाल या बाजारपेठेत जातो. पण किरकोळ विक्री वगळता अद्यापही मोठ्या प्रमाणात लिंब येथील आंबे बाजारात येवू शकलेले नाहीत. हापूस, रत्ना, केसरी, पायरी या जातीचे आंबे सध्या झाडावर मोठ्या प्रमाणात दिसत असले आणि फळ अगदी मोठे झाले असले तरी मजुराअभावी ते काढता येत नाहीत. मजूर शोधण्यासाठी पहाटेपासूनच कष्टकरी, शेतमजूर यांच्या घरी फेरफटका मारावा लागत आहे. सध्या निपाह या व्हायरसच्या भीतीमुळे अनेकजण झाडावर चढण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले आंब्याचे उत्पन्न उतरविण्यापेक्षा काही मजूर हे उपजिविकेसाठी ग्रीन हाऊस, हॉटेलमध्ये वेटर किंवा हलक्या दर्जाच्या शेतीच्या कामाला जात आहेत. तरुणाई ही मोबाईलच्या पायी अडकून पडल्यामुळे वयोवृद्ध पालक आंबे उतरविण्यास तयार आहेत, परंतू दुर्दैवी घटना घडल्यास आंब्यांपेक्षा मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. या भीतीपोटी आता लिंबात आंबे काढण्यासाठी गडी मिळत नाहीत.
सध्या शिवाजीराव पाटील यांनी 2 एकरामध्ये आंब्याची बाग फुलवली आहे. गेल्यावर्षी आंब्याचे उत्पन्न कमी व आंबे काढण्यासाठी मजूर जास्त आल्यामुळे फार फायदा झाला नाही. परंतू यंदाच्या वर्षी आंब्याचे विक्रमी उत्पादन झाले, पण आंबे काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकर्यांची अवस्था बुरे दिन अच्छी रात अशी झाली आहे. त्यामुळे आता शेतकर्यांनाच आंबे उतरविण्यासाठी झाडावर चढण्याची वेळ आली आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |