03:50pm | Dec 08, 2019 |
सातारा : सातारा जिल्हा हा देशभरामध्ये सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील हजारो आजी-माजी सैनिक देशसेवा बजावत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याचा वारंवार उल्लेख करुन सातारा जिल्ह्याबाबत गौरवोद्गार काढलेले आहेत. परंतू ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ तद्वतच जवान जरी सीमेवर लढत असले तरी त्यांचे कुटूंबिय मात्र भीतीच्या छायेखाली जगत असतात. याची गंभीर दखल घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आजी-माजी सैनिकांच्या कुटूंबियांसाठी अनोखा तक्रार निवारण उपक्रम सुरु केला आहे. काल सातार्यात झालेल्या या उपक्रमाला आजी-माजी सैनिकांच्या कुटूंबियांनी तुफान प्रतिसाद आपल्या अडचणी मांडल्या.
सातारा जिल्ह्याला लष्करी परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देवून या भारत देशाचे शत्रूपासून रक्षण करण्याचे काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील गावेच्या गावे लष्करी सेवेत आहेत. पणजोबापासून पणतूपर्यंत अनेक कुटूंबांना लष्करी सेवेची परंपरा आहे. परंतू असे असताना अनेक आजी-माजी सैनिकांच्या कुटूंबियांना मात्र अनेक गंभीर अडी-अडचणींना सामोरे जावे लागते. न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनसह कोर्टाच्या पायर्याही झिजवाव्या लागतात. परंतू देशसेवेसाठी झिजणार्या सैनिकाला मात्र शेवटपर्यंत न्याय मिळण्याची हमी कमीच असते. जवान सिमेवर कार्यरत असताना त्याचे कुटूंबिय मात्र भीतीच्या छायेखाली वावरत असते. या संदर्भातील अनेक तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येत असतात. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर आजी-माजी जवानांच्या आणि कुटूंबियांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर देशसेवा करणार्या जवानांच्या कुटूंबियांचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून सातपुते यांनी जवानांना निर्धोकपणे आपले कर्तव्य बजावता यावे यासाठी तक्रार निवारण दिनाची अभिनव संकल्पना मांडली. त्यांच्या सहकार्यांनीही या अभिनव संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी कंबर कसली आणि काल दि. 7 रोजी पोलीस परेड ग्राऊंड येथे तक्रार निवारण दिनाला प्रत्यक्ष सुरुवात केली. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 309 सैनिक कुटूंबियांनी काल झालेल्या तक्रार निवारण दिनामध्ये आपल्या अडीअडचणी मांडल्या. पोलीस अधीक्षकांनी तसेच इतर अधिकार्यांनी या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी काही तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर अन्य तक्रारींबाबत चौकशी करुन येत्या तक्रार निवारण दिनादिवशी त्या तक्रारींचा निपटारा करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही अधीक्षकांनी अधिकार्यांना दिले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या या अभिनव उपक्रमामुळे आजी-माजी सैनिक कुटूंबे भारावून गेली. अनेकांनी याबाबत पोलीस अधीक्षकांचे आभार मानले तसेच कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्रात प्रथमच सैनिक कुटूंबियांसाठी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम निश्चितच महाराष्ट्रासह देशभरात रोल मॉडेल ठरणार आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्ह्यात हा उपक्रम सुरु झाल्यामुळे तेजस्वी सातपुते यांच्या या उपक्रमाचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |