वाई : राजकीय दबावामुळे सातारा सिंचन विभागाचे नियोजन फसल्याने उत्तर साताऱ्यातील वाई, भोर, खंडाळा, फलटण तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चार टीएमसीच्या या धरणात फक्त २२ टक्के मृत पाणी साठा शिल्लक आहे..या धरणाच्या उभारणीत त्यागाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम भागातील लोकांच्या नशिबीच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर साताऱ्यातील वाई, भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बलकवडी धरणात २२ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. याची झळ वाई तालुक्यासह इतरही तालुक्यांना बसणार आहे.
बलकवडी धरणातून वाई, भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. भोर खंडाळा फलटण बरोबरच वाई तालुक्याला जललक्ष्मी योजनेद्वारे शेतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे धरण असणाऱ्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोर येथे साताऱ्यातील सर्वाधिक पाऊस होतो. राजकीय दबावामुळे कालव्याद्वारे पाणी सोडल्याने सिंचन विभागाचे नियोजन फसले असून पाणी पातळी खालावली. चार टीएमसी च्या या धरणातील पाणी कृष्णा नदी द्वारे धोम धरणात व दोन धरणातून आसरे बोगद्यातून भोर खंडाळा फलटण तालुक्याला कालव्याद्वारे पोहोचविले जाते.
पुढील दुष्काळाचा अंदाज न घेता लोकसभा निवडणुकीत लोकांना खुश करण्यासाठी राजकीय दबाव वापरून या धरणातील पाणी फलटण तालुक्याला सोडण्यात आले. आता धरणात फक्त मृत पाण्याचा साठा शिल्लक राहिल्याने पश्चिम भागात व तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणात पाणी शिल्लक नसल्याने पाण्याची भीषणता उन्हाळ्यात जाणवणार आहे. पाणी पातळी खालावल्याने जुन्या खुणा उघड्या पडल्या आहेत. वाई तालुक्याच्या सिंचनाकडे बलकवडी पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वाई तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. फलटण तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरण सध्या पूर्ण रिकामे होवून त्यागाची भूमिका घेणाऱ्या भागातच ऐन उन्हाळ्यात काही किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे. सिंचन विभागाच्या निष्काळजी पणाचा फटका येथील लोकांना बसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |