कोल्हापूर: राज्यातील सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने श्रमिक वर्ग सध्या तणावाखाली आहे. राज्य सरकारने पुढील दोन तीन महिन्यांसाठी कामगार, मजूर, श्रमिक, सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे, असं सांगताना चंद्रकांत पाटील यांनी 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली आहे. करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलनाची हाक दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आंदोलन करताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याने 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरावं. जोपर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री रस्त्यावर उतरुन संवाद साधत नाहीत तोपर्यंत गोष्टी सुधारणार नाहीत. सर्व काळजी घेऊन त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि लोकांना सांगितल पाहिजे की, आम्ही प्रशासनाच्या बैठका घेत आहोत, विरोधी पक्षांसोबत बैठका घेत आहोत. त्यांनी जिवावर उदार व्हावं असं म्हणत नाही. सगळी काळजी घेऊन ते रस्त्यावर उतरणार नाहीत तोपर्यंत यंत्रणा हालणार नाही. बाहेर फिरताना अनेक गोष्टी, चुका लक्षात येतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
गेल्या 60 दिवसांत मुख्यमंत्री घराबाहेर पडायला तयार नाहीत. मातोश्री हे मुख्यमंत्री निवासस्थान असू शकत नाही. वर्षा आवडत नसेल तर त्यांनी इतर कोणती जागा निवडावी. परंतू सरकारी निवासस्थानीच राहिलं पाहिजे. मातोश्री कॉलनीतील लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार करा. सर्व सरकारी अधिकारी, नेत्यांनी उठून मातोश्रीवर जायचं, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. दोन महिने आम्ही सरकारला सहकार्य केलं. पण सरकार आपली काही भूमिका बजावणार नाही, काम करणार नाही आणि सहकार्य करा असं म्हणणार असेल तर हे बरोबर नाही. राज्य सरकारनेही आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे. आरोग्य व्यवस्था नीट करण्यासाठी एकत्रित रचना केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |