नाशिकः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. नाशिकमध्ये 26 ते 28 मार्च दरम्यान होणार होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय साहित्य मंडळाने हे संमेलन 26 ते 28 मार्च ऐवजी मे मध्ये घेण्याचे ठरविले आहे. याबाबतची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी रविवार (7 मार्च) रोजी एका पत्रकान्वये केली.
राज्यातील वाढत्या कोरोना प्रभावामुळे नाशिक मध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावे असा सुर साहित्यिकांमधून व नाशिककरांकडूनही आळवला जात होता. नाशिकमध्ये सध्या करोनाची फारशी चिंता नसली तरीही बाहेरुन येणार्या साहित्यिकांकडून करोनाचा फैलाव होऊ शकतो. राज्यात सध्या मुंबई पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार वाढतो आहे. यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेऊन संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही दिवसांपासून संमेलनाच्या कार्यालयातील हालचाली देखील मंदावल्या होत्या. संमेलनाला अवघे काही दिवस बाकी असताना कोणत्याही प्रकारच्या कामाची लगबग दिसत नव्हती. एव्हाना संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या उभारणीला सुरुवात होणे अपेक्षित होते, परंतु तशी कुठलीही चिन्हे संमेलन स्थळी दिसली नाही. त्याच बरोबर कार्यक्रम पत्रिका अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच संमेलनाचे उद्घाटक कोण असणार व संमेलनाचा समारोप कुणाच्या हस्ते करायचा याचा निर्णय झालेला नाही. त्याच बरोबर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचे नियोजन बाकी आहे. संमेलन नियोजित वेळी होणार असेल तर या बाबींची पूर्तता व्हायला हवी होती. मात्र याची काहीही चिन्हे दिसली नाही. संमेलनाच्या स्वागताध्यक्षकांना करोना झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्याच बरोबर समित्याचे अनेक कार्यकर्ते देखील करोना बाधीत झाले आहे. साहित्य संमेलनाला बहुतांश ज्येष्ठ नागरिक येणार आहेत. त्याना करोनाची बाधा झाल्यास नसते बालंट नको म्हणून खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना नाशिकचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून बैठकीत हा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलन पुढे ढकलले असले तरीही संमेलनाचे नियोजन बैठका सुरु रहाणार आहे. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. संमेलनाच्या कार्यालयात विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |