सातारा: निसर्गाची किमया आणि नारळात पाणी, तशी अवस्था सध्या दुष्काळी माण-खटाव तालुक्यातील माणनदीकाठी पाहण्यास मिळत आहे. गेली पंधरा दिवस कोसळणार्या परतीच्या पावसाने दुष्काळी तालुक्यातील नदीकाठचे पूल काही ठिकाणी घाट बनले आहेत.
याबाबत माहिती अशी की, गेली काही वर्षे दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी सर्वच पक्षाने राजकारण केले. पिण्याचे पाणी टँकर, चारा छावण्या सुरू करून शासकीय पातळीवर मदतीचा ओघ सुरू केला. पाणी आडवा, पाणी जिरवा व त्या जोडीला पाणी फाउंडेशन, लोकसहभाग यातून तहानलेल्या दुष्काळी भागातील शेतकरी व जनतेला दिलासा देण्यासाठी निसर्ग धावून आला. ज्या ठिकाणी नदीच्या पात्रात वाळवंट झाले. तेथे वाळूचा ठिय्या दिसू लागला. ओरबडून वाळूचे कण रगडण्यास आली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून काहींनी कोरड्या नदी पात्रात वाळूने खिसे भरले. भ्रष्ट शासकीय यंत्रणा व काही लोकप्रतिनिधी यांच्या मर्जीने वाळूचे अमाप पीक आले.अखेर निसर्गानेच येथील तहानलेल्या जमिनीची तहान भागवून अनुशेष भरून काढला. तसेच नदी पात्राचे रक्षण केले. असे म्हणण्याची पाळी आली आहे.
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द ते कदम वस्ती तसेच पुढे रानंद, जाशी, मोही, मार्डी, सुवसान आणि त्यापुढे जाणार्या शिखर शिगणापूर रस्त्यावरील गोंदवलेखुर्द नजिक माण नदीवरील पुलावरून अतिवृष्टीमुळे पाणी वाहू लागले आहे. दोन्ही बाजूचा संपर्क तुटला असल्याने सध्या पुलाचा वापर हा घाटासारखा झाला आहे. याठिकाणी अंघोळी, कपडे धुवणे असा आनंद काही ग्रामस्थ घेत आहेत. तसेच महत्वाच्या कामानिमित्त काही चार व दुचाकी वाहन चालक तसेच पाण्याचा अंदाज घेऊन कदम वस्ती, शेडगे वस्ती, फाळके वस्ती येथील काही ग्रामस्थ नदीपुलावरील पात्रातील वाढलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करीत आहेत.
भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे, अशी माहिती माजी सैनिक हेमंत कदम, विजय ढालपे, व काही महिलांनी दिली आहे. सध्या महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे केले आहेत. परंतु, ज्या ठिकाणी पुरामुळे पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. त्याची ही पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन समिती मार्फत तातडीने अशा पुलाच्या दूतर्फी किमान सुरक्षितता म्हणून काही तरी उपयोगी योजना राबवावी अशी मागणी होत आहे. सध्या अतिवृष्टीमुळे रस्त्याची ही चाळण झाली आहे. त्याबाबत ही लक्ष दयावे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत दुर्घटना घडू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |