05:15pm | May 28, 2020 |
मुंबई: राज्यात सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटाविरोधात सर्वांनी एकत्र येवून लढाई लढायची आहे. कोरोना संकटकाळात महाराष्ट्रात राजकीय संकट उभं राहून राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी असे अजिबात वाटत नाही, असे असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारे भाजप नेते व राज्यसभा सदस्य नारायण राणे पक्षात या मागणीवरून एकाकी पडले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणे यांच्या या भूमिकेला छेद दिला.
करोनाच्या स्थितीवरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार शब्दांत निशाणा साधला. राज्यातील करोना साथीची स्थिती चिंताजनक आहे. देशातील 36 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सरकारने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली नसल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. धारावी व वरळी भागात करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. मुंबईत रुग्णलये, बेड, अॅम्ब्युलन्सचा तुटवडा आहे. करोनाचे रुग्ण रस्त्यावर मरत आहेत. सरकारने ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या. त्या केल्या नाहीत म्हणूनच ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. मुंबईत कमी प्रमाणात स्वॅब घेतले जात असल्याचा आरोप करताना मुंबईत दररोज किमान 10 हजार स्वॅबची तपासणी होऊ शकते मात्र प्रत्यक्षात साडेतीन हजार चाचण्याच केल्या जात आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून ते प्रमाण आणखीच कमी झाले आहे, असे सांगताना चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |