12:00pm | Jul 02, 2022 |
नवी दिल्ली : गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील राजकारणामध्ये हा निर्णय जातीय समिकरणांचा विचार करुन घेण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान आता एकेकाळी काँग्रेसला अशाच पद्धतीने खिंडार लावणारे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलताना याचा उल्लेख केला आहे. हैदराबादच्या भाजपा बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा, पक्षाला द्यावं लागलं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे हे मराठा असल्याचा उल्लेख करत ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की 'मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती. अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की 'फडणवीस-शिंदे जोडी' पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करेल." एकनाथ शिंदेंप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदेंनीही केलेली बंडखोरी- एकनाथ शिंदेंप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळेस आता महाराष्ट्रातील आमदारांप्रमाणेच शिंदेंसोबतचे समर्थक आमदारही पक्षातून बाहेर पडले होते. यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पडलं होतं. शिंदे गटाच्या समर्थनावर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते.
ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं सुनियोजित कारस्थान
मात्र शिंदेंनी राज्य सरकारमध्ये कोणतंही पद घेतलं नव्हतं. परंतु नंतर त्यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी तसंच केंद्रीय मंत्रीपदही दिलं. 'काय झाडी, काय डोंगार' फेम आमदार होणार का पर्यटन मंत्री? का भाजपकडून गेम? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून यात जातीय समिकरणाचा अँगलही बराच चर्चेत आहे. ब्राह्मण महासंघानेही याबाबत रोष व्यक्त करत निवेदन जारी केलं. यात लिहिलं होतं की "पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी नितीन गडकरींचं चारित्र्यहननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडवण्याकरिता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवत आहे. भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं एक सुनियोजित कारस्थान चाललेलं निदर्शनास येत आहे", असंही यात म्हटलं होतं.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |