04:58pm | Jul 25, 2020 |
बुध: ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणे हे चुकीचे असून लोकशाहीची थट्टा आहे, त्या सरपंच व ग्रामपंचायतील सदस्य यांना संधी द्या, अशी मागणी रिपाई (आठवले) गटाने गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच राज्य सरकारने चालू मार्च- एप्रिल ते डिसेंबर महिन्यामध्ये कार्यकाल संपणार्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलून त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला असून त्याचे सर्वाधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे अशा निर्णयाचा रिपाई (आठवले) गट खटाव तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून आज गावांच्या विकासाचा केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीवर स्वतःच्या मर्जीचा प्रशासक नेमून लोकशाहीची थट्टा केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हे एका पक्षाचे लोकप्रतिनिधी असतात. ते स्वतःच्या पक्षाच्या विचारधारेचे काम करतात. प्रसंगी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना अधिक संधी देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या मर्जीच्या व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमून गावाचे सर्व राजकारण स्वतःच्या हातात कसे येईल व आपल्या पक्षाचा फायदा कसा होईल हे पाहिले जाईल.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वाईट काळामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची तसेच कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावांमध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावत आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा मुदत वाढवून संधी देण्यात यावी, अथवा त्यांची त्यांच्यातीलच सदस्यांना प्रशासक म्हणून पुढील काही महिने पुन्हा एकदा जबाबदारी द्यावी, अन्यथा येणार्या काळामध्ये जिल्हाअध्यक्ष अशोक गायकवाड (बापु) यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदन देतेवेळी रिपाई (आठवले) गटाचे नेते गणेश भोसले, मयुर बनसोडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष कुनाल गडाकुंश, अर्जुन भालेराव, मयुर कांबळे, सुरज भोसले आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |