सातारा : भारतीय जनता पक्ष देशात विरोधी पक्ष संपवण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात त्यांना देशात विरोधी पक्षाचे अस्तित्वच ठेवायचे नसून फक्त भाजपा पक्षच देशाचा कारभार करू शकतो असा त्यांचा कार्यक्रम ठरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात यापुढे विरोधी पक्ष संपणार असे जाहीर बोलून भाजपची आगामी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून भाजपाच्या या धोरणाला विरोध केला तरच देश अखंड राहील, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, ज्येष्ठ नेते विजयराव कणसे, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक हे प्रमुख उपस्थित होते
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हे विरोधी पक्ष संपवण्यासाठी काम करत असून त्यांना देशात विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाही. त्यांना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या पावलावर पाऊल टाकून धोरण राबायचे असून भविष्यात देशात एकच पक्ष आणि त्यांचाच पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे धोरण राबवायचे आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहणे गरजेचे आहे, तरच देशातील लोकशाही टिकेल. देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. या योगदानाबाबत भाजप जनतेत संभ्रमावस्था निर्माण करून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करत आहे. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका संदर्भात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. काँग्रेस पक्ष आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे, मात्र सन्मानाने आघाडी होणार असेल त्यासाठी ही तयार आहोत असेही सांगून कार्यकर्त्यांना इच्छुक उमेदवारां ची नावे जिल्हा काँग्रेस कमिटीकडे पाठवावेत, त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्ष स्तरावर निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, सातारा शहराध्यक्ष रजनी पवार, , जगन्नाथ कुंभार, अन्वर पाशा खान, , महेंद्रसिंग बेडके, पंकज पवार, श्रीकांत चव्हाण, संदीप चव्हाण, दत्तात्रय धनवडे, पांडुरंग यादव, हेमंत जाधव, बाबासाहेब माने, मनीषा पाटील, रजिया शेख उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |