04:13pm | Mar 07, 2021 |
सातारा : देशभर कोरोनाचे संकट घोंघावत असून 16 हजार बाधितांपैकी महाराष्ट्रात 10 हजार 500 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.अशावेळी सोशल डिस्टन्सिंग व तोंडाला मास्क लावणे अपरिहार्य आहे. मनसे नेते राज ठाकरे यांना चिंता नसल्यामुळे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश ते मानत नाहीत, म्हणून ते मास्क घालत नाहीत, अशी कोपरखळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सातार्यातील पत्रकार परिषदेत मारली.
सातारा जिल्ह्यातील दोन दिवसांच्या दौर्यानंतर दुपारी सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये ना. रामदास आठवले यांची नियोजित पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी पत्रकारांपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून दहा मिनिटे त्या कार्यकर्त्यांना हॉलमधून बाहेर काढण्यातच गेली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ना. आठवले म्हणाले, देशात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यामुळे सामान्य लोक चिंताग्रस्त आहेत. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे कर कमी केले तर भाववाढ कमी होईल. कॉंग्रेसच्या राजवटीमध्ये 10-12 वेळा भाववाढ झाली होती, याचीही त्यांनी आठवण करुन दिली. दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले, आंदोलन करण्याचा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. पण त्यामध्ये राजकारण करु नये. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधाचा फायदा भाजपालाच होत आहे. नामांतराच्या आंदोलनामध्ये मराठवाडा हा शब्द तसाच ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अशी तडजोड केली. त्यामुळे नामांतराचा हा प्रश्न निकाली निघाला. शेतकर्यांनी दिल्लीतील आंदोलन थांबवावे. शेतकर्यांमुळे आपण जगतो, त्यांच्याबद्दल प्रेम आहे. त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. तिनही कायदे शेतकर्यांच्या विरोधात नसून जेथे जास्त पैसे मिळतील, तेथे माल विकता येईल. हे कायदे शेतकर्यांच्या भल्याचेच आहेत. कायदा मागे घेता येत नाही, तर त्याच्यात सुधारणा करता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी 1 कोटी 26 लाख 239 रुपये बजेट केले आहे. तर अनुसूचित जातीसाठी 1 लाख 34 हजार एवढे बजेट केले आहे. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रात तीन हजार सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यातील काहीजण सरपंचही झाले आहेत. परंतू ज्याठिकाणी अनुसूचित जातीचा सदस्य नाही, त्याठिकाणी सरपंचपदाचे चुकीचे आरक्षण टाकून उपसरपंचांना अधिकार दिल्याचे दिसून येत आहे. त्यात बदल करावा, अशी आम्ही मागणी केली आहे. जे पक्ष कधीही एकत्र येणार नाहीत, ते सत्तेत एकत्र आले आहेत. पण जे एकत्र होते, ते बाजूला गेले आहेत. देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र, ही घोषणा अनेकदा केली आहे. त्यावेळी शिवसेनेने विरोध केला नाही, असे सांगून आठवले म्हणाले, कॉंग्रेसने पाठिंबा काढला तर हे सरकार जाऊ शकते. सध्या शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री सापडले आहेत, आता कॉंग्रेसचा मंत्री बाकी आहे, असेही सांगून ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यामुळे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरे मिळणार आहेत. मागासवर्गीय भरती, अनुशेष व पदोन्नती याबद्दलही त्यांनी भाष्य केले. ईडी, आयकर, सीबीआय यांच्या धाडी नको असतील तर उद्योगपती, राजकीय नेत्यांनी चांगले धंदे करावेत. शेतकरी आंदोलनाला व्यापक दृष्टीकोनातून पाहिले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, तालुकाध्यक्ष अप्पा तुपे, खटाव तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, कृणाल गडांकुश, अण्णा वायदंडे, चंद्रकांत अहिवळे, अमर गायकवाड, मधुकर आठवले, सचिन वायदंडे, अप्पासाहेब गायकवाड, किशोर गालफाडे व आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |