05:46pm | Dec 02, 2021 |
कराड : कराड शहर व परिसरासह संपूर्ण तालुक्याला बुधवारी अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला पाऊस काहीशा विश्रांतीनंतर पहाटेपर्यंत सुरु होता. त्यामुळे ऊस, हरभरा आणि शाळू पिकांना याचा मोठा फटका बसला असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे.
सध्या, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असून तालुक्यात सर्वत्र ऊसतोड चालू आहे. परंतु, गत दहा-पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात ओलावा निर्माण झाल्याने फक्त पक्या रस्त्यालगतच्या ऊसतोडी व्यतिरिक्त अन्य तोडी मंदावल्या होत्या. त्यानंतर आत्ताकुठे शेतातील अतिरिक्त ओल कमी होऊन पुन्हा ऊसतोडी सुरु होण्याच्या मार्गावर होत्या. त्यातच काल बुधवारपासून पुन्हा तालुक्यासह जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून सायंकाळपासून पहाटेपर्यंत जोरदार पडलेल्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे अनेक ठिकाणी ऊसतोडी पूर्णपाने ठप्प झाल्या असून काही वाहने शेतात अडकून पडली आहेत. परिणामी, पक्या रस्त्याकडी ऊस वगळता अन्य ऊसतोडी सुमारे 15 ते 20 दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर शाळू व हरभरा या रब्बी पिकांसाठीही जास्तीचा पाऊस मारक ठरणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसू येत आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने केरळ व उर्वरित कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात ३ डिसेंबरपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार बुधवार दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कराड शहर व तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सुमारे तास-दीडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. त्यानंतर चार-दोनदा काहीशा विश्रांतीनंतर गुरुवारी पहाटेपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाले तुडुंब झाले असून तालुक्याच्या दक्षिण भागातील दक्षिण मांड नदीला मोठे पाणी आले आहे.
दुकान गाळ्यांमध्येही शिरले पाणी
कराड शहर परिसरालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, प्रवाशांची मोठी दैना झाली असून वाहतूकीवरही पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून शहराच्या सखल भागातील अनेक दुकानगाळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याचे दिसून आले.
ऊसतोड मजुरांना अवकाळीचा फटका
बुधवारी सायंकाळपासून सुरु झालेला अवकाळी पासून गुरुवारी पहाटेपर्यंत काहीशा विश्रांतीनंतर सुरूच होता. याचा सर्वात जास्त फटका ऊसतोड मजुरांना बसला असून त्यांच्या झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून आले. यामध्ये ऊसतोड मजुरांचे अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून गेल्याने त्याचे नुकसान झाले आहे. रात्री झालेल्या पावसात काही ठिकाणी ऊसतोड मजुरांनी मंदिर तसेच प्राथमिक शाळांची ओसरीचा आसरा घेतला असून पहाटेनंतर झोपडीत साचलेले पाणी काढताना त्यांना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |