12:45pm | Jun 25, 2021 |
बीजिंग: उलट्या बोंबा मारण्यासाठी प्रसिध्द असणार्या चीनने सवयीप्रमाणे आता नवा आरोप केला आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव भारतामुळे झाला आणि त्यासाठी भारताने केलेले अतिक्रण जबाबदार असल्याचा दावा चिनने केला आहे. आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणार्या चीनने भारताविरोधात केलेला दावा हास्यास्पद आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतावर आरोप केले आहेत. लिजियान यांनी म्हटले की, भारत-चीन सीमेवरील पश्चिम क्षेत्रात चिनी सैन्य तैनात करणे ही सामान्य संरक्षण व्यवस्था आहे. चीनच्या क्षेत्रात होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी केलेली ही व्यवस्था असल्याचे सांगत भारतानेच मागील काही काळापासून सीमेवर अधिक जवान तैनात करून आमच्या क्षेत्रावर अतिक्रमण केले असल्याचा आरोप लिजियान यांनी केला.
तणावसाठी भारताकडून होत असलेले अतिक्रमणच जबाबदार असल्याचे चीनने म्हटले. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी शांततेचा मार्ग अवलंबला पाहिजे. सीमा प्रश्नाला द्विपक्षीय संबंधाशी जोडता कामा नये असेही लिजियान यांनी म्हटले. चर्चेतून सीमा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कतार इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, सीमेवरील वादग्रस्त भागात चीन सैन्याची कुमक कमी करण्याचे आश्वासन पूर्ण करणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे ही बाब दोन्ही देशातील संबंधासाठी एक आव्हान आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |