04:27pm | Sep 26, 2020 |
सातारा: दापवडी येथील चार इसमांनी बोगस दाखल मिळवत शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मौजे रांजणी येथील जमीन महु-हातेघर धरणात बुडीत क्षेत्रात असल्याने शासनाकडून जमीन देण्यात आली होती. यात पुनर्वसन घोटाळा झाला असल्याची तक्रार आकाश बाजीराव रांजणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. यानुसार आता पाटबंधारे खात्याने या बोगस धरणग्रस्तांना भत्ता आठ दिवसांत परत करण्याचे आदेश दिले आहे व तसे न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी मौजे दापवडी गावाचे मुळचे स्थायिक विनायक आनंदराव रांजणे, जयेश विनायक रांजणे, जयंत विनायक रांजणे, तसेच अमित विनायक रांजणे यांना मौजे रांजणी येथील जमीन महु - हातेघर धरणात बुडीत क्षेत्रात असल्याने शासनाकडून जमीन देण्यात आली होती. परंतु याबाबत आकाश बाजीराव रांजणे यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून पुनर्वसन घोटाळा झाला असून यामधील दोषी अधिकारी व लाभ धारक यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. याबाबत सविस्तर चौकशी होऊन जिल्हा पुनर्वसन अधिकारी समीक्षा चंद्राकर उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांनी आकाश रांजणे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याने याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. परंतु चौकशी सुरु असताना संबधित इसमांना भत्ता अदा करण्यात येऊ नये अशी मागणी रांजणे यांनी केली होती. त्यावर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख यांनी पाटबंधारे खात्यास वरील इसमांना भत्ता अदा करू नयेत असे आदेश दिलेले होते. परंतु तत्कालीन तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी कायदेशीर बाबींची शहानिशा न करता संबधित इसमांचे बाजूने अहवाल दिला. त्यानुसार पुढील आदेश झालेला नसताना तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण प्रलंबित असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता चावरे यांनी भत्ता अदा केला होता. याबाबत रांजणे यांनी तक्रार देऊन उपविभागीय अधिकारी यांचे भत्ता अदा करू नये असे आदेश असताना तसेच पुढील कोणतेही आदेश नसताना तत्कालीन कार्यकारी अभियंता चावरे तसेच तहसीलदार आखाडे यांच्याकडून सदर भत्ता वसूल करा अशी तक्रार दिली होती. त्यानुसार पाटबंधारे खात्याने भत्ता अदा करताना नमूद इसमा कडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेतले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांचेकडील निकाल विरोधात गेल्यास भत्ता परत करीन अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यानुसार पाठबंधारे विभागाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा अहवाल ग्राह्य धरून विनायक रांजणे, जयंत रांजणे, जयेश रांजणे व अमित रांजणे यांना भत्ता परत करण्याबाबत वारंवार कळवून देखील त्यांनी भत्ता जमा न केल्याने कार्यकारी अभियंता यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना 8 दिवसात संबधित इसमांनी भत्ता जमा न केल्यास कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते, त्यानुसार आज सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या वतीने अधिकारी श्री सावंत यांनी दापवडी येथील सरपंच यांना पत्रव्यवहार करून समक्ष गावात जाऊन पंचनामा केला असून सदर इसमाना 8 दिवसात भत्ता अदा करण्याबाबत ताकीद देऊन तो जमा न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाईचे पत्र दिले आहे.
याबाबत संबधित अधिकारी व लाभधारक ज्यांनी संकलनामध्ये बोगस नावे दाखल केली आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच अजून किती बोगस संकलन तयार केली आहेत व भूखंड वाटप केले आहेत याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी आकाश बाजीराव रांजणे यांनी केली आहे. तरी पाठबंधरे खात्याने भत्ता परत मागितल्याने अनेक बोगस खातेधारकांचे धाबे दणाणले आहेत. पुनर्वसनच्या नावाखाली काही नेत्यांनी शासनाचा गैरफायदा घेतल्याचे व त्यास अधिकारी व शासकीय यंत्रणेने सहकार्य केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सण 2011 साली जेव्हा महू हातेघर पुनर्वसन जमीन वाटप सुरू होते. तेव्हा याच विनायक आनंदराव रांजणे यांनी आकाश रांजणे यांना मिळालेली जमीन रांजणे यांचे कोणतेही अधिकारी पत्र नसताना स्वतः ताबा घेतली होती व तत्कालीन उपविभागीय अधिकारी रामदास जगताप यांनी मुळ खातेदार यांना पसंतीनुसार जमीन वाटप करणे बंधनकारक असताना विनायक रांजणे यांची सही घेऊन आकाश रांजणे यांची जमीन वाटप केली होती. यावरून अधिकारी यांचे यामध्ये हितसंबंध दिसून येत आहेत तसेच सदर इसमाचा जवळचा नातेवाईक या भागातील धरणग्रस्त नेता असल्याने वरील नियमबाह्य लाभ अधिकार्याकडून पदरात पाडून घेतले असल्याचे दिसून येते. याबाबत संपूर्ण पुनर्वसनची चौकशी व्हावी म्हणून मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आकाश रांजणे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |