04:55pm | Aug 31, 2020 |
चेन्नई: जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. तब्बल 96 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. इंटरनेट जोडणीतील दोष, सर्व्हरच्या कार्यात आलेला अडथळा, यामुळे वादग्रस्त ठरलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील भारत आणि रशिया यांच्यातील अंतिम लढतीत दोन्ही देशांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) ही घोषणा केली. ऑलिंपियाडमधील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.
या अंतिम लढतीतील पहिल्या डावात भारत-रशिया यांच्यात 3-3 अशी बरोबरी झाली होती. सगळ्या सहा डावांत ‘स्टेलमेट’ झाले. रशियाने दुसरा डाव मात्र 4.5-1.5 असा जिंकला. यात आंद्रे एसिपेन्कोने निहाल सरीनवर मात केली, तर पोलिना शुवालोव्हाने दिव्याला नमविले; पण भारताने इंटरनेटच्या जोडणीत झालेला बिघाड या पराभवास कारणीभूत असल्याची तक्रार केली. त्याआधी, दुसर्या डावात आनंदने इयन नेपोमनियाकचीविरुद्ध बरोबरी केली, तर कर्णधार विदीत गुजराथीनेही दानिल दुबोव्हला बरोबरीत रोखले होते. कोनेरू हम्पीला अलेक्झांड्रा गोर्याखकिनाने नमविले आणि डी. हरिकाने अलेक्झांड्रा कोस्तेनिउकला बरोबरीत थोपविले.
अंतिम लढतीत भारत रशियाकडून 1.5-4.5 असा पराभूत झाला होता. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या पटावर दिव्या देशमुख, निहाल सरीन यांच्या लढतींना इंटरनेट जोडणीतील दोषाचा फटका बसला आणि वेळेच्या बंधनात अडकल्यामुळे त्यांना लढत गमवावी लागली. तिसर्या पटावर खेळणार्या कोनेरू हम्पीलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. याचा फटका अर्थातच भारताला बसला. त्यावर भारतीय संघाने ’फिडे’कडे दाद मागितली आणि या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेणार्या समितीने दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद घोषित करण्याचा निर्णय घेतला.
वेंकट सर्वानन याने केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले होते, की दिव्या देशमुखचे दुर्दैव, की तिला वेळेच्या बंधनात अडकून पराभव पत्करावा लागला; पण ती विजयाच्या अगदी जवळ पोहोचली होती. दिव्याने ही लढत जिंकली असती, तर त्याचा फायदा भारताला मिळाला असता; पण इंटरनेटमधील दोषाचा फटका भारताला बसला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |