12:22pm | Jun 24, 2020 |
नवी दिल्ली : चीनशी सीमेवर संघर्ष उडालेला असतानाच पाकनेही काश्मीरमधील सीमेवर गोळीबार व उखळी तोफांचा मारा सुरू ठेवला आहे. गेल्या महिनाभरात यामध्ये चार भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. पाकने निवासी भागांतही हा शस्त्रास्त्र हल्ला सुरू ठेवला आहे. त्यास भारतीय जवानांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. सीमेवर संघर्ष सुरू असतानाच, नवी दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्तालयही भारतीय गुप्तचरांच्या नजरेत आले होते. तेथील काही कर्मचारी भारताविषयीची संवेदनशील व गोपनीय माहिती गोळा करीत असल्याचे तसेच भारताविरुद्ध हेरगिरीच्या प्रयत्नांत असल्याचे दुवे गुप्तचरांच्या हाती लागले होते. त्यामुळे भारताने हा मुद्दा वारंवार पाकच्या राजनैतिक पटलावर मांडला होता.
चीनसोबतचा लष्करी तणाव टिपेला पोहोचलेला असतानाच, पाकिस्तानशी सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाचा आता राजनैतिक पातळीवरही भडका उडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्तातील कर्मचारी संख्येत पाकिस्तानने निम्म्याने कपात करावी, असे भारताने सुनावले आहे. या सोबतच इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तातील कर्मचार्यांची संख्याही तेवढीच कमी करण्याचा निर्णयही भारताने घेतला आहे.
अखेर मंगळवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्याला पाचारण करून याबाबत जाब विचारला व भारतातर्फे तीव्र आक्षेप नोंदवला. ’पाकिस्तानी राजनैतिक अधिकार्यांकडून होणारी हेरगिरी व दहशतवादी संघटनांसोबतच्या त्यांच्या संबंधांबाबत भारताने वारंवार चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानची कृती व्हिएन्ना कराराचा भंग करणारी आहे. तसेच राजनैतिक व उच्चायुक्तालयातील अधिकार्यांच्या वर्तनाबाबत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या द्विराष्ट्रीय कराराचेही उघड उल्लंघन करणारी आहे,’ अशीही औपचारिक तक्रार भारताने या वेळी संबंधित अधिकार्याकडे नोंदवली. अलीकडेच दोन भारतीय अधिकार्यांना पाकिस्तानात बंदुकीच्या धाकावर ताब्यात घेण्यात आले होते व त्यांना अज्ञात स्थळी घेऊन जाण्यात आले होते. पाकिस्तानी सरकार भारतीय अधिकार्यांना वाईट वागणूक देत असल्याची औपचारिक तक्रारही संबंधित अधिकार्यासमोर मांडण्यात आली. मंगळवारी सकाळी या अधिकार्यासमोर भारतीय परराष्ट्र अधिकार्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले व त्यानंतर रात्रीच परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तालयातील कर्मचारी संख्येत कपात करण्यास सांगण्यात आले व स्वत:हून हाच निर्णय इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातही राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |