दिल्ली : २६ जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांच्या हृदयावर अभिमानाने कोरला गेलेला दिवस आहे. कारण याच दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करीत युद्ध जिंकले होते. सुमारे अडीच महिने चाललेल्या या 'ऑपरेशन विजय'मध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. आज संपूर्ण देशभरात कारगील विजय दिवस साजरा केला जात असून शहिदांना आदरांजली वाहिली जात आहे. लष्कर, हवाई आणि नौदलाच्या प्रमुखांनी देखील शहिदांना आदरांजली वाहिली.
यावेळी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कारगील विजय दिवसच्या निमित्ताने पाकिस्तानला काय संदेश देणार असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'पुन्हा असं करु नका. आगळीक एकदा केल्यानंतर सहसा पुन्हा कोणी पुनरावृत्ती करत नाही. पुढच्यावेळी चुकीला माफी नाही'.
यावेळी बिपीन रावत यांनी देशवासियांना अजिबात चिंता न करण्याचा सल्ला दिला, त्यांनी म्हटलं की, 'मी देशवासियांना सांगू इच्छितो की त्यांनी अजिबात चिंता करु नये. सुरक्षा दलांना दिलेली जबाबदारी कितीही कठीण असली तर ती पूर्ण केली जाईल. आमचे जवान सीमारेषेची सुरक्षा करत आहेत'. यावेळी त्यांनी ताफ्यात आधुनिक शस्त्रांचा समावेश केला जात असल्याचंही सांगितलं.
याआधीही गुरुवारी बोलताना बिपीन रावत यांनी पाकिस्तान पुन्हा असा बालिशपणा करेल असं वाटत नसल्याचं म्हटलं होतं. त्यांनी आता आपली ताकद कळली आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. आता आपल्याकडे आधुनिक साधनं उपलब्ध असून घुसखोरी करणाऱ्यांची माहिती मिळवू शकतो अशी माहिती त्यांनी दिली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |