पुणे : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज अखेर इतिहासजमा झाला. द्रुतगती महामार्गाला अडथळा ठरणार्या या पुलाच्या चारही खांबांना एकाचवेळी ब्लास्टिंग करुन रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता स्फोट करुन हा पूल जमीनदोस्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नियुक्त केलेल्या नवयुग टीमचे प्रमुख अनिल कुमार आणि टीमकडून हे काम आज फत्ते झाले.
आज रविवारी सकाळपासून पुलाच्या दगडी खांबांना सुरुंगाची दारु भरण्याकरिता होल करण्याचे काम सुरु होते. साधारण प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळला.
4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. काल पुलावरील पाईपलाईन हलविल्यानंतर आज पुलाच्या खांबांना ब्लास्टिंगकरिता होल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता पुण्याकडे जाणारी सर्व वाहने अंडा पाँईट येथून जुन्या मार्गाने तर मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट येथून लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. ब्लास्टिंगच्या वेळी दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली होती.
ब्रिटिशकाळात कोकण प्रांत हा दक्षिण महाराष्ट्राला जोडण्याकरिता या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. हा पूल धोकादायक झाल्याने मागील काही वर्षापासून त्याच्यावरुन वाहतुक बंद करण्यात आली होती. या पुलाच्या खालून मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग जातो. पुलामुळे मार्गावर वळण आले असून रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे वारंवार याठिकाणी अपघात घडत असल्याने तो वाहतुकीकरिता अडचणीचा ठरत होता. मागील तीन वर्षापासून हा पुल पाडण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, द्रुतगती मार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते.
सध्या भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुक तुरळक असल्याने येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पुल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज पुल पाडण्यात आला असून पुढील दोन दिवसात रस्त्यावरील मातीचे ढीग व दगड बाजुला केले जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |