कराड : सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात व राज्यात निवडून आलेले सरकार हे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारे तसेच सरकार निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या घोषणा करून जनतेला भूलविण्याचे काम केले आहे, देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे होण्याची भिती निर्माण झाली आहे, त्यासाठी देशात व राज्यात परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ ओगलेवाडी ता.कराड येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रसंगी बोलत होते.
या मेळाव्यास काय पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य देवराज दादा पाटील, जिल्हा परिषद परिषदेचे विद्यमान सदस्य सह्याद्री कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे माजी पंचायत समिती माजी सदस्य बाळासाहेब सुर्यवंशी, रामदास पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोपाळराव धोकटे, विश्वासराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सवंग लोकप्रियतेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठी भाषणे करून खोटे बोलून देशातील जनतेला वेठीस धरले गेले. नोटबंदी, जीएसटी यांसारख्या केलेल्या घोषणा देशातील जनतेला त्रासदायक ठरल्या, अशा सरकारच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी देशात परिवर्तन करणे काळाची गरज असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
देवराज दादा पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचेशी संवाद साधण्याचे काम या मतदारसंघांमध्ये झाले. याच मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आघाडी मधून उमेदवारी मिळाली परंतु याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणार्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला हीच मोठी शोकांतिका आहे. सर्वसामान्य जनतेने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने केलेली आंदोलने, निदर्शने मोडीत काढण्याचे पाप या सरकारने आजपर्यंत केलेले आहे. या देशामध्ये शाहू, ङ्गुले, आंबेडकरांचा सर्व धर्म समभावाचा विचार तळागाळात रूजलेला असून, त्यांनी तयार केलेली घटना, तसेच देशाचे संविधान बदलण्याचा कुटील डाव या सरकारने चालविला आहे. अशा या हुकूमशाही सरकारला या निवडणूकीत बाहेरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन देवराजदादा पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी मानसिंगराव जगदाळे म्हणाले की, कॉंग्रेस विचारसरणीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून देशात वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, उद्योगधंदे या सारख्या सुविधा निर्माण झाल्या. व देश महासत्ता होण्याच्या बनविण्यासाठी याच कॉंग्रेस विचारसरणीचा मोलाचा वाटा आहे.
या मेळाव्यास ऍड चंद्रकांत कदम, ऍड दादासाो जाधव, रामदास पवार, शंकर खापे-बापू, प्रशांत यादव, प्रकाश नलवडे, सय्यद सर, भगवान पाटील, संपतराव नलवडे, संभाजी नलवडे, मोहनराव नलवडे, बाळासाो नलवडे, जयसिंग पाटील, श्रीरंग जाधव, महिपती माने, सर्जेराव पानवळ, तानाजी माने, विजय आतकरे, दिगंबर डांगे, अधिक पवार, अधिक सुर्वे, सुरेश पाटील, पराग रामुगडे, सतिश तावरे, भगवान कांबळे, सैनिक घाडगे, प्रताप सावंत, सतिश डांगे, हुसेन मुल्ला, मुरलीधर कांबळे, राजू सुर्यवंशी, उमेश माने, धनाजी माने, पंडीत नलवडे, मिलींद सुर्वे, हणमंत नलवडे, कुमार पवार, संपतराव पाटील यांचेसह ओगलेवाडी, पार्ले, बनवडी, सयापूर, टेंभू, विरवडे, सुर्ली, शामगांव, कामथी, करवडी आदि गांवचे ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |