सातारा : स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळात मरेपर्यंत जातीअंत, सामाजिक न्याय, तळातील, उपेक्षित समाजाला न्याय मिळावा यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे भाई वैद्य. सध्याच्या काळात भाई वैद्य उणीव अधिकच भासेल. त्यांचे विचार आणि कार्य यापुढेही नेटाने पुढे सुरु ठेवणे हीच हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सातारा येथे बोलताना केले.
परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सातारकर नागरिकांच्या वतीने जेष्ठ समाजवादी विचारवंत स्मृतिशेष भाई वैद्य याना आदरांजली वाहण्यासाठी सातारा येथील पाठक भवन मध्ये जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे बोलत होते. विचारमंचावर जेष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके उपस्थित होते.
माझा व भाईंचा परिचय २५ वर्षाहून अधिक काळाचा होता. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करून बोलणे हि त्यांची खासियत होती. माझ्या पुस्तकातील संदर्भ देतानाही ते नेहमीच वरवर न बोलता पानांचा संदर्भ देऊन ते बोलत असत. अभ्यासपूर्ण मांडणी करणे हा त्यांच्या वैशिट्यातील अविभाज्य भाग होता असेही प्रा.डॉ. आ.ह.साळुंखे म्हणाले.
साथी एस एम जोशी, साथी ना. ग. गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाई वैद्य यांच्यातील कार्यकर्ता घडला. धर्मनिरपेक्ष विचाराचे भाई सतत हिंदू - मुस्लीम यांच्या ऐक्यासाठी निस्पृहपणे कार्यरत राहिले. जाती अंताच्या कार्यात ते झटत राहिले. असे सांगून राष्ट्र सेवा दलाच्या शाखेतील भाईंचे सहकारी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी भाईंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
स्मगलरकडून लाच स्वीकारण्यास सांगून त्या स्मगलरांच्या मुसक्या आवळण्यात भाई वैद्य कसे यशस्वी झाले याची आठवण व घटना त्यावेळचे कस्टमचे सब इन्स्पेक्टर विजय देशपांडे यांनी सांगितली. तर राष्ट्रसेवा दलाचे माजी जिल्हा अध्यक्ष कॉ. किरण माने यांनी साताऱ्यातील एका स्वातंत्र्य सैनिकांच्यावर अन्याय झालेला समजताच रात्रीच कशी अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला हे सांगितले .
यावेळी जेष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके, राष्ट्र सेवा दलाचे उपेंद्र पिसे, माकपचे कॉ वसंतराव नलावडे, सातारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र झुटिंग, अंगणवाडी संघटनेचे शौकत पठाण, यांनीही आदरांजली वाहिली .
यावेळी कॉ अंजलीताई महाबळेश्वरकर, अरुण गोडबोले, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, मानसोपचारतज्ञ् डॉ. प्रसन्न दाभोलकर, गणपतराव साळुंखे, भगवान अवघडे, उदय चव्हाण, कॉ.अस्लम तडसरकर, शिवाजी राऊत, कॉ शंकर पाटील, कॉ शिवाजी पवार, मिनाज सैयद, जयंत उथळे, प्रा. युवराज जाधव, प्रा. अमृत साळुंखे, महेश गुरव, लखन जगताप , अमित कांबळे डॉ. राजेंद्र माने, दिलीप ससाणे, संजय म्हस्के, अनिल मोहिते, यांचेसह अनेकजण यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |