02:18am | Jan 24, 2020 |
सातारा : अर्थसंकल्पाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या दुकलीने अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना कधीच अर्थसंकल्पीय बैठकांना बोलावले नाही. कोणत्या विद्यापीठातून त्यांनी डिग्री घेतली ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. स्वयंभू असण्याच्या अविर्भावात मोदींनी अर्थव्यवस्थेची प्रचंड घसरण केल्याची टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
येथील कॉंग्रेस कमिटीमध्ये त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ""केंद्रीय अर्थसंकल्प घोषित करण्यासाठी वेळापत्रक निश्चित केले जाते तो दंडक प्रथमच मोडण्यात आला .अर्थमंत्री हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक घेतात. त्यांची परंपरा खंडीत करण्यात आली . अर्थसंकल्पाच्या झालेल्या 13 बैठका नरेंद्र मोदी, अमित शहा यांनीच घेतल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बैठकांना बोलाविले नव्हते. त्यांची कामगिरी सुमार आहे, त्यांच्यावर विश्वास नसेल तर महिलेचा अवमान करण्यापेक्षा अर्थमंत्री बदलावा.''
भारताचे सध्याचे दरडोई उत्पन्न दोन हजार डॉलर आहे. ते दुप्पटीने वाढविले पाहिजे. मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेचा विकास ढासळला. माजी आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांनी मोदी सरकार विकासदाराचे आकडे 2.5 टक्क्यांनी फुगवून सांगत आहे, असा आरोप केला आहे. त्यावरून हा विकासदर केवळ दोनच टक्के आहे, असे समोर येत आहे. आमच्या सरकारच्या काळात 2010-11 मध्ये हा विकासदर 10.8 टक्के होता.
कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. नोटाबंदीने अर्थव्यवस्थेवर तर आता "सीएए', "एनआरसी'ने संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
श्री. चव्हाण म्हणाले, ""सीएए, एनआरसी या कायद्यांत मुलभूत बदल करून देशाच्या संविधानावर हल्ला केला आहे. शहा, मोदींमध्ये विसंगती आहे. मोदींना शहांनी खोटे पाडले आहे. लोकशाहीच्या निर्देशकांमध्ये भारत 41 स्थानावर होता. आता तो 51 स्थानावर घसरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संविधान असुरक्षित असल्याची भावना आहे. हा कायदा सरकारने रद्द करावा.''
श्री. चव्हाण म्हणाले, ""देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा वापर केला. त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी वाढली. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक वाढली नाही. मोठे पायाभूत प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. नवीन एकही सार्वजनिक उद्योग राज्यात आला नाही. मेक इन इंडियाच्या केवळ जाहिराती करत राहिले. गेल्या 45 वर्षात सर्वात जादा बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात आली. महाराष्ट्रात तर कोणताच उद्योग आला नाही. फडणवीसांनी विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार फडणवीसांचे होते. ते थांबविण्यासाठीच तीन पक्ष एकत्र आलो.''
पवारांचे माझे चांगले जुळते
2014 च्या निवडणुकीनंतर भाजप अल्पमतात होते. त्यावेळी शिवसेनेबरोबर सरकार का झाले नाही, हा प्रश्न वेगळा आहे. त्यावेळी शिवसेनेबरोबर जाण्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळी निर्णय घ्यायला हवा होता, हे आता वाटते, असे एका प्रश्नावर सांगून राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. चव्हाण यांन स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माझे चांगले जुळते, असेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |