07:02pm | Jul 11, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 2.80 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 2.25 लाख शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. जवळपास 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. जवळपास 1268.62 कोटी चे वाटप करण्यात आले आहे. पिक कर्ज वाटपाचे काम जिल्ह्यात चांगले झाले आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी काढले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आज विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी गौरावोद्गार काढले. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, विभागीय उपायुक्त प्रताप जाधव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 9 तालुक्यांचे सातबारा संगणकीकरण काम पूर्ण झाले आहे. तसेच डीजीटल सहीचे (डीएसपी) चे काम प्रगतीपथावर आहे. 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत सातारा जिल्ह्यासाठी एकूण 23 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. हे काम युद्ध पातळीवर सुरु असून सुमारे 26.43 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 5 लाख 12 हजार 878 इतक्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी दिली.
पालखी सोहळ्यामध्ये सामील होणाऱ्या पालखी रथ, दिंड्या, वारी, पदयात्रा यांच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या तळांची पहाणी करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी असणारी अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तसेच पालखी सोळ्याचे मोबाईलवर ॲपलिकेशन तयार करण्यात आले असून यामध्ये सर्व शासकीय यंत्रणेची माहिती व पालखी सोहळ्याच्या मार्गामध्ये उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती व अनुषंगीक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
नागरिकांना प्लास्टीक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बचत गटांना पिशव्या तयार करण्याचे काम ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात आले असून लवकरच बचत गटांच्या पिशव्या बाजार पेठेत उपलब्ध होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात सन 2016-17 मध्ये 210 गावांची निवड करण्यात आलेली होती. 210 गावांतील 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामांमुळे भुजल पातळीत 0.51 मी. ते 1.38 मी. इतकी वाढ झालेली आहे. यामुळे टँकरच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. तसेच सन 2017-18 मध्ये 210 गावांपैकी 74 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हेसैकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |