02:30am | Sep 09, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी अंतर्गत आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात मोठे बंड उभे राहिले असून कोरेगाव स्वाभिमानी मंचच्या माध्यमातून नेतृत्व बदलासाठी एकसळ (ता. कोरेगाव) येथे उद्या 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. आमदारविरोधी गटातील प्रमुख राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, स्थानिक नेत्यांच्या जाहीर सभेत कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या विद्यमान नेतृत्वाच्या विरोधात मोठा एल्गार पुकारण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अंतर्गत सूत्रांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यात आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघात सन 2000 पासून आजअखेर 2018 सालापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या विधानसभा निवडणुकीत माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी सलग दोन वेळेला तब्बल दहा वर्षे राष्ट्रवादीतून निवडून येवून राष्ट्रवादीच्याच माध्यमातून आमदारकी उपभोगली. त्यानंतर सातत्याने पक्षप्रमुख खा. शरद पवार यांच्याविरोधात टिका केल्याने आणि सतत पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पक्षप्रमुख खा. शरद पवार यांनी 2009 साली शरद पवार यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली. आणि कोेरेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या तिकीटावर आ. शिंदे यांनी 2009 आणि सन 2014 सालची विधानसभेची निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने जिंकली. सलग 9 वर्षे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आ. शिंदे यांनी केले. पक्षाचे नेते आ. अजित पवार, खा. शरद पवार यांचे आदेश मानून 2009 आणि सन 2014 सालची विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच निष्ठावान कार्यकर्त्यांनी आ. शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. राष्ट्रवादीचे सुनील खत्री, शाहूराज फाळके, अरूण माने, सुनील माने, भगवानराव जाधव, अनिल बोधे, अॅड. विजयसिंह शिंदे, अजयबापू कदम, नाना भिलारे, राजू भोसले, बाळासाहेब फाळके, नारायण फाळके, किशोर बाचल, विठ्ठल कदम सह कोरेगाव तालुक्यातील शेकडो राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या विजयात दोन्ही निवडणुकीत मोलाचा वाटा उचलला.
गेले 9 वर्षे आ. शिंदे हे कोरेगाव तालुक्यासह कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या कालावधीमध्ये जलसंपदामंत्रीपद आणि सातारा जिल्हयाचे पालकमंत्रीपद भूषवण्याची संधी आ. शिंदे यांना मिळाली. या कालावधीत त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतीच्या पाण्याचा प्रश्न, स्मार्ट सिटीत तालुक्यातील मोठी गावे समाविष्ट करण्याचा प्रश्न, पुसेगाव परिसरात विमानतळ, कारखानदारी, इंजिनिअरींग, मेडिकल कॉलेज, जलसिंचन असे अनेक प्रश्न शिंदे यांच्या प्रयत्नाने सुटतील, असे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील जनता, शेतकरी, बेरोजगार युवकांना वाटले होते. परंतु दुर्दैवाने गेल्या 9 वर्षात वरील बहुतांश प्रश्न मार्गी लागलेच नाहीत. आणि कोरेगाव तालुक्यातील जनतेच्या पदरी निराशाच आली.
त्यातच ज्या ज्या पक्षकार्यकर्त्यांनी सन 2009 आणि सन 2014 सालच्या निवडणुकीत आ. अजित पवार, खा. शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादीच्या माध्यामातून आ. शशिकांत शिंदे यांचे निष्ठेने काम केले. त्यांना योग्य तो सन्मान पक्ष नेतृत्वाकडून म्हणजेच आ. शिंदे यांच्याकडून मिळाला नाही, अशी तक्रार राष्ट्रवादीमधील अनेक प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली. परंतु त्यांची दखल राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतली नाही. एकिकडे कोरेगाव तालुक्यात महत्वाची विकासकामे मार्गी लागत नाहीत.
तर दुसरीकडे गावोगावचे निष्ठावान पक्ष कार्यकर्त्याला स्थानिक आमदाराकडून सन्मान मिळत नाही, असा नाराजीचा सूर तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागला. गावागावातील कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपून जाण्याची वेळ निर्माण झाल्याचा सूर पक्षातंर्गत उमटू लागला. यामुळे एक वर्षापूर्वी विद्यमान नेतृत्व बदलल्याशिवाय राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना किंमत मिळणार नाही या विचाराने कोरेगाव तालुक्यातील निवडक प्रमुख कार्यकर्त्यांनी कोरेगाव तालुका स्वाभिमानी विचारमंचची स्थापना केली. एका सामुदायिक भिसी मंडळाच्या माध्यमातून काही प्रमुख कार्यकर्ते एकत्रित बैठका घेऊ लागले. याच मागणीसाठी 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. एकसळ, ता. कोरेगाव येथे स्वाभिमानी विचार मंचची जाहीर सभा होणार आहे. सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे निवडक 800 कार्यकर्ते या ठिकाणी सभेला उपस्थित राहून आ. शशिकांत शिंदे यांच्याविरोधात एल्गार पुकारणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |