नवी दिल्ली : देशात पुन्हा मोदी लाट आली असून, भाजपने एकट्याने 299 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 349 मतदारसंघात आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकट्याला पुन्हा बहुमत मिळणार आहे.
देशातील पूर्व किनारपट्टीवरील राज्यात थोडा फार विरोध वगळता भाजपने देशात पुन्हा सर्वत्र विरोधकांवर मोठी आघाडी मिळविली. विशेषतः उत्तर भारतात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. बुथपातळीपर्यंतचे कार्यकर्त्यांचे जाळे आणि आक्रमक प्रचार यांच्या जोरावर भाजपने देशात एकहाती सत्तेकडे वाटचाल केली.
कॉंग्रेसने तीन राज्यात सत्ता मिळविली. मात्र, त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला नाही. कॉंग्रेस देशभरात केवळ 52 मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघात साडेपाच लाख मतांची आघाडी घेतली असली, तरी ते अमेठी मतदारसंघात पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या प्रचाराला पक्षाला फारसा उपयोग झाला नाही.
उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले होते. यंदाही महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने त्यांची गेल्या वेळची कामगिरी पुन्हा यंदाही बजावली. उत्तर प्रदेशात सप-बसप-रालोद महागठबंधन मोठा प्रतिकार करेल, अशी चर्चा होती. मात्र, बसप 11 जागांवर, सप सहा जागांवर, तसेच रालोद एका जागेवर आघाडीवर आहे. कॉंग्रेसच्या सोनिया गांधी आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात भाजपने साठ जागांवर आघाडी घेतली आहे.
बिहारमध्येही 40 पैकी 38 जागांवर आघाडी घेत भाजप व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूने कॉंग्रेस-राजद यांच्या महागठबंधनवर निर्विवाद मात केली. राजदच्या दोन जागा वगळता, अन्य पक्षांना बिहारमध्ये खाते उघडता आले नाही.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने 42 पैकी 22 जागांवर आघाडी घेतली. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, गेल्या वेळी भाजपचे दोन खासदार होते, यंदा भाजपने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. ओरिसामध्ये बिजू जनता दलाने 21 पैकी 15 मतदारसंघात आघाडी घेतली आहे.
आंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेसने 25 पैकी 23 जागांवर आघाडी घेतली आहे. तेलगू देशम पक्षाला केवळ दोन जागावर समाधान मानावे लागत आहे.
तमिळनाडूमध्ये मात्र द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपची घोडदौड रोखली. द्रमुकने 23 मतदारसंघात आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी अण्णा द्रमुकने 37 जागा जिंकल्या होत्या. यंदा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने 36 जागांवर आघाडी घेतली असून, अण्णा द्रमुकला केवळ दोन जागा मिळत आहेत. भाजपला येथे खाते उघडता आले नाही.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |