नवी दिल्ली : शस्त्र बाळगण्याच्या धोरणांमध्ये मोठा बदल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. प्रस्तावित धोरणांनुसार एका व्यक्तीला केवळ एकच बंदूक बाळगता येणार असून त्यांपेक्षा अधिक बंदूक बाळगल्याचे आढळल्यावर दंडा व्यतिरिक्त सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. आतापर्यंत एका व्यक्तीला तीन बंदूक सोबत बाळगण्याचा परवाना आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या गुन्ह्यात शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
कुठल्या सोहळ्यादरम्यान अथवा उत्सवात हवेत गोळीबार करणा-या अशा घटनांना आळा बसण्यासाठी शस्त्र बाळगण्याच्या धोरणांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी हवेत गोळीबार करणे, गरज नसतानाही, दहशत निर्माण करण्याच्या हेतूने बंदुकीचा वापर केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असून एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडासह दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते, अशी तरतूद नवीन प्रस्तावित धोरणांमध्ये करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावावर काही सुचना मागवण्यात येणार असल्याची माहिती गृह खात्याने दिली आहे.
शस्त्र बाळगण्याचा परवाना असलेले सोबत तीन बंदूक बाळगण्याची अनुमती आहे. शिवाय तीन पेक्षा अधिक बंदूक बाळगल्याप्रकरणी तीन वर्ष कारावासासह दंडाची तरतूद आहे. प्रस्तावित धोरणांनुसार एका व्यक्तीस केवळ एकच बंदूक सोबत बाळगण्याची अनुमत देण्यात आली आहे. शिवाय एका पेक्षा अधिक बंदूक बाळगल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करुन सात वर्ष तुरंगवास अथवा आजीवन कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात येणार आहे.
शस्त्रास्त्र कायद्यात प्रस्तावित केलेल्या सुधारणांमध्ये सैन्यदलातून अथवा पोलिसांकडून लुटलेल्या शस्त्रांचा अवैधरित्या वापर केल्याप्रकरणी तसेच शस्त्रांची अवैधरित्या तस्करी केल्याप्रकरणी होणा-या शिक्षेमध्ये वाढ करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. गुन्हेगारीच्या चार नवीन प्रकारांसाठी शिक्षा समान नसणार आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सात वर्ष तुरुंगवास पुढे 14 वर्ष वाढवण्यात येईल तर दंड ठोठावण्यात येणार आहे. सध्या याप्रकरणी पाच वर्ष तुरुंगवास पुढे, 10 वर्ष वाढवण्यात येईल, तसेच दंड ठोठवण्यात येत आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून संसदेत सुरु होणा-या अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |