08:08pm | Jun 17, 2018 |
सातारा : महिन्याच्या कालखंडात मुंबईतील मोठ्या मोर्चानंतर देखील प्रतिसाद दिला नाही. इतर समाजाने मोर्चे काढले असते,तर सरकारने गुडघे टेकून त्यांना वंदन करून मागण्या मान्य केल्या असत्या, परंतु 10 महिन्याच्या कालखंडात मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या सरकारने केल्याची टिका मराठा क्रांतीचे समन्वयक शरद काटकर यांनी पत्रकार परीषदेत केली. दरम्यान यापुढे शासनाला कोणतेही निवेदन नाही, चर्चा नाही आता निकराची लढत देताना गमिनी काव्याने मराठा समाजाची आंदोलने होतील असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पिंपरी-चिंचवडमध्ये झाली. यावेळी आबा पाटील,माणिकराव शिंदे,संतोष सूर्याराव,विवेकानंद बाबर, महेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. शरद काटकर पुढे म्हणाले की, शासनाने सुरुवातीच्या काळात फसव्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र काहीच नाही, मराठा समाजाच्या मुलांना टक्केवारी चांगली मिळाली परंतु आर्थिक विवंचनेमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही ही मराठा समाजाचे शोकांतिका आहे. शेजारी बसणार्या मुलांना अडीच तीन हजारात वैद्यकीय,अभियांत्रिकेचे शिक्षण घेता येते,परंतु मराठा समाजाच्या मुलांना चांगली टक्केवारी पाच-पाच लाख रुपये प्रवेश फी भरून प्रवेश मिळत नसल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले, 80 टक्के समाज शेतकरी आहे, 40 एकर जमिनीचे चार गुंठ्यावर आलो, कारण मराठा या नावामुळे कुठल्याच सवलती मिळत नाही ही वस्तुस्थिती असल्याचं सांगितलं. शासन फसवत आहे, हे मराठा समाजाला जाणीव होऊ लागली आहे. याचे पडसाद 2019 मध्ये निश्चितपणे उमटतील. मुख्यमंत्र्यांनी खूप आश्वासन दिले आहेत. आरक्षण देतो म्हणाले परंतु त्यांनी कायद्यात अडकवलं,त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळत नसल्याचेही काटकर यांनी सांगीतले.
दरम्यान 29 जून रोजी तुळजापूर येथे जागरण गोंधळ घालून पहिले आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिली. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी हे आंदोलन असेल, इथून पुढे मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला न सांगता गनिमीकावा स्वरूपात आंदोलन होणार, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा समाजाचे असंख्य तरुण जाऊन कोणत्या क्षणी आंदोलन करतील याची तारीख जाहीर केली जाणार नाही असं देखील सावंत सांगीतले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील म्हणाले, इतर समाजाचे बांधव हे आमचे छोटे भाऊ आहेत. त्यांना दिलेल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ते समाजामध्ये गैरसमज निर्माण पसरवत आहेत. आमचं आरक्षण थांबल तरी चालेल पण दिलेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही आमची प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी सांगीतले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |