02:54am | Dec 07, 2019 |
सातारा : महात्मा गौतम बुद्ध हा विवेक, विज्ञानवादाचा जनक आहे. त्याने जगाला पंचशीलाचे तत्वज्ञान व मानवजातीला दुःखमुक्तीच्या अष्टांगिक मार्गाची देणगी दिली आहे, असे मत विवेक वाहिनीचे समन्वयक व छ. शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ३३ व्या थोरांच्या स्मृती- व्याख्यानमालेत परिवर्तनाचे दीपस्तंभ विषयसूत्रामधील 'बुद्ध धम्माची वैश्विकता' या विषयावर ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, विश्वस्त रमेश इंजे उपस्थित होते. डॉ. वाघमारे यांचा प्रारंभी सत्कार करण्यात आला.
डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बुद्धाचे पंचशील धोरणाचा आपल्या भारत देशासाठी स्वीकार केला आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या देशाच्या राज्यघटनेत बुद्धाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.
बुद्धाच्या अगोदरचा अडीच हजार वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास हा अंधारयुगाचाच आहे. बुद्धाने बहुजन हिताय, बहुजन सुखाय या सर्वसमावेशक तत्वाचा विनम्रवादी धम्म सांगितला आहे. तो कुणावर वार करायला सांगत नाही. भारतात बाराशे वर्षे बुद्धाच्या धम्माचे अधिराज्य होते. तर जगातील अनेक देशांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे. ख्रिश्चन, मुस्लिम धर्मावर देखील बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडलेला असावा असे काही विद्वानांचे मत आहे.
प्रसिद्ध तत्वज्ञ सिग्मन्ड फ्रॉइडच्या अगोदर मनाचे विश्लेषण बुद्धाने केलेले आहे. त्यामुळे त्यांना मनाचे पहिले डॉक्टर म्हणता येईल. त्यांनी दुःखाच्या कारणांचा शोध घेतला. तृष्णा हे त्याचे मूळ आहे. त्यांच्या मुक्तीचा अष्टांगिक मार्गही सांगितला आहे. समाजातील शूद्र वर्णाच्या व्यक्तींना धम्माची दीक्षा देण्याचे जाती निर्मूलनाचे पहिले कामाचा प्रारंभ बुद्धानीच केला आहे. त्याच्या धम्मात आत्मा, पुनर्जन्म, अंधश्रद्धा, कर्मकांडाला थारा नाही. ईश्वराचे अस्तित्वही त्यांनी नाकारले असून धम्मप्रसारात मनपरिवर्तनावर त्याचा भर आहे. त्यांच्या हयातीनंतर धम्म प्रसार झालेल्या देशातील संस्कृतीचा या धम्मावर छाया पडलेली आहे. महायान पंथामुळे धम्माचे मूळ स्वरूप बदलले गेले आहे.
रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. जेष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ, सुभाष जाजू, प्रा.दत्ताजी जाधव, डॉ.संजयकुमार सरगडे, बाबासाहेब सावंत, शाहीर फरांदे, पालीचे अभ्यासक प्रसाद गायकवाड, कॅप्टन यशपाल बनसोडे आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |