01:35am | Nov 18, 2019 |
सातारा : निसर्गाने मारले आणि पाऊसाने झोडपले तर दाद कोणाला मागायची. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व बाजूने नुकसान झाले असून शासनाने खरिप पिकांसाठी अनुदान हेक्टर ८ हजार जाहीर केले आहे.ते २५ हजार मिळावे. यासाठी सातारा जिल्ह्यातील तब्बल २०० हून अधिक सरपंच हे सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी शासनाकडे मागणी करणार आहेत. दुपारी दोन वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी मान्य करण्यासाठी प्रसंगी गावबंद आंदोलन करणार असल्याचे सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा स्तर हा ग्रामपंचायती आहे. मात्र शासनाकडून ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मागणीची दखल कधीच घेतली जात नव्हती.आता राज्यभर सरपंच संघटीत झाल्याने सरपंच परिषदेच्या माध्यमातून गावचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न यापुढे परिषद प्रयत्न यशस्वी होत आहेत. शेतकऱ्यांची मुले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे आमच्या प्रश्नांची आम्ही सोडवणूक करु.आधी विनंती, नंतर आंदोलन आणि न्याय न मिळाला तर न्यायालयात दाद मागणार आहोत,असे सातारा तालुक्याचे अध्यक्ष आणि लिंब गावचे सरपंच अँड.अनिल सोनमळे यांनी सांगितले.
यावर्षी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संबंधित विभागाकडून न्याय मिळणार नाही,असे चित्र स्पष्ट दिसते. यामुळे शासनाकडून अन्याय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील २०० गावचे सरपंच एकवटले आहेत. जेव्हा सरपंच याप्रश्नी पुढाकार घेतील,तेव्हा शासन ही गांभीर्याने विचार करेल, हा विश्वास सरपंच परिषदेच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्षा आणि पुळकोटीच्या सरपंच मंदाकिनी सावंत यांनी व्यक्त केले.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीला खरिप पिकासाठी हेक्टर८ नाही तर शेतकऱ्यांना २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी.यासाठी शासनास निवेदन सोमवारी दुपारी २ वा. जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत,असे संपर्क प्रमुख शेळकेवाडीचे सरपंच संतोष शेळके यांनी सांगितले. यावेळी सतिश इंगवले(रिसवड), समाधान पोपळे (वालूथ), आनंद जाधव (दरे),चंद्रकांत सणस(जकातवाडी), रणजित पाटील (वडगाव),रामभाऊ देवकर (बनपुरी), रामचंद्र सावंत (दिवड),अविनाश पाटील (विहे), जीवन जाधव(निनाम), आशा जाधव (गोवे), अल्पना यादव (गुळूंब),सुरेखा डुबल(वडोली नि.) अफसना मुजावर (एनकूळ),सुनीता पाटणे,शंकरराव खापे(बनवडी)सुचेता मोहिते( कोरिवळे), कविता देशमुख (भाटमरळी),अजित माने(भोसे),बजरंग चौधरी(मामुर्डी), धनश्री शिंदे (शिंदेवाडी),शीतल देशमुख (सिद्धेश्वर कुरोली),अविनाश शेडगे(शेडगेवाडी),वैशाली मोकाशी (उरुल), राजेंद्र पाटील (कोयना वसाहत),प्रशांत गोरड (विरली) शीतल गायकवाड (शामगाव),आरेवाडी रेश्मा यादव, यांच्या सह अनेक गावचे सरपंच उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |