12:39am | Jun 04, 2018 |
वाई : पसरणी घाटात धारदार शस्त्राने आनंद ज्ञानेश्वर कांबळे (वय 32) याच्या खुनाचा उलगडा वाई पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात केला असून पत्नीनेच प्रियकराच्या सहकार्याने पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीसांनी प्रियकर निखील सुदाम मळेकर (वय 24, रा. चिखली, पुणे) याला अटक केली आहे. अन्य साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. मयत आनंद याची पत्नी दिक्षा हिने खूनाचा कट रचल्याची कबुली दिल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शनिवारी पसरणी घाटात चार अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येवून घाटात थांबलेल्या आनंद कांबळे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला होता. याबाबतचा तपास पोलीस उपअधिक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक वेताळ व त्यांचे सहकारी करत होते. लुटमारीचा बनाव करून हल्लेखोरांनी पोलीसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र घटनास्थळावरील पार्श्वभूमी लक्षात घेवून पोलीसांनी ही घातपाताची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवून पोलीसांनी त्या दिशेने तपासाची सुत्रे गतीमान केली होती.
पो. नि. वेताळ यांनी पुण्यातील माहितीगारांच्या आधारे दिक्षा व संशयित आरोपी निखील यांचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळविली होती. त्यानूसार पोलीसांनी आपला मोर्चा पुण्याला वळवला. रविवारी सकाळपासून केलेल्या तपासात आरोपी मळेकर याला निगडी (पुणे) येथे सापळा रचुन ताब्यात घेतला. तत्पूर्वी शनिवारी रात्री उशीरापर्यंत दिक्षा हिच्या मोबाईलवरून मळेकर याच्याशी संपर्क साधल्याने दोघांच्यातील प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले होते.
दिक्षाचा विवाह 20 मे रोजी आनंदशी झाला होता. तिचे व निखीलचे प्रेम असल्याने दिक्षा या लग्नापासून नाखूश होती. निखीलने दिक्षाच्या वडिलांकडे लग्नासाठी मागणी घातली होती. परंतू त्यांनी नकार देवून तीचा विवाह आनंदशी करून दिला होता. दिक्षा व निखील यांनी आनंदच्या खूनाचा कट रचला होता. त्यानुसार निखील व त्याचे साथीदार शुक्रवारीच पाचगणीला मुक्कामी आले होते. पुण्यातून निघाल्यानंतर दिक्षा मळेकर याला प्रवासाचे लोकशन सांगत होती. पसरणी घाटात आल्यानंतर तीने नियोजीत कटानुसार उलटी येत असल्याचे कारण सांगून कार घाटात सोळा नंबर येथे थांबवली. त्यानंतर ती बाहेर उतरून उलटी येत असल्याचे नाटक करत वेळ घालवला. यावेळी घाटातच दबा धरून बसलेल्या चौघा मारेकरांनी दुचाकीवरून येवून दिक्षा उभी असलेल्या ठिकाणी जावून बेसावध उभा असलेल्या आनंदवर त्यातील दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला आनंद काही क्षणात रक्ताच्या थारोळयात खाली कोसळला. यावेळी त्यांच्या सोबत असलेले राजेश भगवान बोबडे व त्याची पत्नी कल्याणी बोबडे हे नवदांपत्य यांनी भितीपोटी घटनास्थळावरून पाचगणी पोलीस ठाण्याला गेले. दरम्यान रक्ताच्या थारोळयात पडलेल्या आनंदला व दिक्षाला पाचगणीवरून आलेल्या एका वाहन चालकाने रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत असलेल्या आनंदला डॉक्टरांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून सातारला हलविले होते. रुग्णालयात नेण्यापूर्वीच आनंदचा मृत्यू झाला होता.
पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन येडगे, सहाय्यक फौजदार त्रिंबक अहिरेकर, कृष्णा पवार, जितेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, त्रिंबके, ठोंबरे, लोखंडे, सचिन ससाणे, दडस, कांताराम बोर्हाडे, सोमनाथ बल्लाळ, शरद बेबले, रुपेश कारंडे आदींनी तपासात मोलाची कामगिरी केली.
आनंदचा नाहक बळी...
आरपीआयचा (आठवले गट) पदाधिकारी असलेला आनंद औंध परिसरात आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांमध्ये सुपरिचीत होता. दोन आठवडयापूर्वी मोठया उत्साहात त्याचा दिक्षाशी विवाह झाला होता. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्याने मोठया थाटात विवाह समारंभ संपन्न केला होता. पत्नी दिक्षाला पाचगणी, महाबळेश्वरला फिरायला घेवून येणार्या आनंदला नियतीच्या मनात काय आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र दिक्षाने स्वतःच्या प्रेमापोटी आनंदचा नाहक बळी दिल्याने औंध परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस जमलेल्या हजारोंच्या समुदायावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येत होता.
टिके व वेताळ यांच्या कामाचे भरभरून कौतुक...
बहुचर्चीत डॉ. संतोष पोळ याच्या सैतानी कृत्याचा पर्दाफाश करणार्या पो. नि. वेताळ व वर्षापूर्वी वाई उपविभागाचा कार्यभार स्विकारलेल्या टिके यांनी आपल्या कार्याची चुनूक दाखवत अवघ्या 24 तासात आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी करून दाखविली आहे. महिन्यापूर्वी मांढरदेव घाटात घडलेल्या हत्येचा उलगडाही याच दोघांनी मोठया शिताफीने अवघ्या दोन दिवसात केला होता. आनंदची हत्या पसरणी घाटात झाली होती. शिवाय दागिणे चोरण्याचा प्रयत्नात खून झाल्याचेही सर्वत्र पसरले होते. पाचगणी, महाबळेश्वर हे सुरक्षीत पर्यटणस्थळ असल्याने पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जावू नये म्हणून हा तपास तातडीने होणे गरजेचे होते. त्यानुसार काही तासात या घटनेचा पर्दाफाश केल्याने तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |